महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा ६३ वा वर्धापन दिन आज (१ मे २०२३) रोजी साजरा होत आहे. याच दिवशी १९६० रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. तत्पूर्वी राज्य पुनर्रचना आयोगाच्या शिफारशीनंतर राज्यात संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीने जोर धरला. २१ नोव्हेंबर १९५६ रोजी मुंबईच्या फ्लोरा फाऊंटन येथे झालेल्या आंदोलनात पोलिसांच्या गोळीबारात १०६ आंदोलक हुतात्मे झाले. या प्रखर आंदोलन आणि मोठ्या जीवितहानीनंतरदेखील स्वतंत्र महाराष्ट्राच्या निर्मितीला पुढची साडेतीन वर्षे संघर्ष करावा लागला. सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय आघाड्यांवर मराठीजनांनी चिवट संघर्ष केल्यामुळेच पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मुंबईसह महाराष्ट्राच्या निर्मितीला मान्यता दिली. महाराष्ट्राची निर्मिती झाली असली तरी संयुक्त महाराष्ट्र काही आपल्याला मिळाला नाही. राज्य पुनर्रचना आयोग आणि त्याआधी स्थापन झालेल्या दार आयोग आणि जेव्हीपी समितीने पाचर मारून ठेवली, कर्नाटक राज्यातील ८६५ गावे महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी आजही महाराष्ट्र एकीकरण समितीचा लढा सुरूच आहे. २००४ साली महाराष्ट्र सरकारने या लढ्याला कायदेशीर लढाईत रूपांतरित केले. १८ वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. संयुक्त महाराष्ट्राची मागणी नेमकी कधी झाली? संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीआधी नेमक्या कोणत्या घडामोडी घडल्या आणि आज महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाची सद्यःस्थिती काय आहे? यावर घेतलेला हा आढावा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा