इंटरनेटचा जसा जसा विकास होत गेला, तशी संवादाची अनेक साधनेही विकसित होऊ लागली. मागच्या वीस वर्षात या क्षेत्रात इतक्या वेगाने प्रगती झाली की, काही वर्षांपूर्वी संवादासाठी वेगवान मानली जाणारी ‘तार’ कालबाह्य होऊन गेली. संवादाची साधने वाढल्यानंतर शब्द, प्रतिमा, चित्रफित यातूनही संवाद साधण्याची सोय निर्माण झाली. त्यातूनच पुढे आल्या इमोजी. आपल्या भाव-भावनांना व्यक्त करण्यासाठी एका साध्या चित्राचा किंवा तंत्रज्ञानाने डिझाईन केलेल्या छोट्या चिन्हांचा वापर होऊ लागला. या चिन्हांच्या आपण एवढी आदी झालो आहोत की आज जवळपास अनेक लोक सर्रास त्याचा वापर करतात. पण चिन्हांचाही काही अर्थ आहे. जर विचार न करता त्याचा वापर केला तर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. असेच एक प्रकरण सध्या जगभर गाजत आहे. व्यवसायासंबंधी चर्चा करत असताना कराराच्या विषयावर थम्स-अप असा जुजबी रिप्लाय दिल्यामुळे एका शेतकऱ्याला ५० लाखांचा दंड बसला आहे. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर काय घडले? न्यायाधीशांनी या प्रकरणातून काय अर्थ काढले? हे सविस्तर पाहू या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा