भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची १९८४ मध्ये हत्या झाल्यानंतर उत्तरेतील अनेक राज्यात हिंसाचार उसळला होता. दिल्लीतही शीखबहुल भागात दंगल उसळली. याप्रकरणी काँग्रेसचे नेते जगदीश टायटलर यांच्यावर दोषारोप ठेवून त्यांची चौकशी सुरू आहे. चार दशके व्हायला आली तरी टायटलर यांच्या मानगुटीवरून या दंगलीचे प्रकरण बाजूला झालेले नाही. मागच्या आठवड्यातच केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने जगदीश टायटलर यांच्या आवाजाचे नमुने घेतले. दिल्लीमधील पुल बंगश या भागात १९८४ साली शीखविरोधी दंगल उसळून तीन लोकांचा खून झाला होता, या प्रकरणात जगदीश टायटलर यांच्या आवाजाचे नमुने घेऊन त्याचा तपास केला जाणार आहे. सीबीआयच्या म्हणण्यानुसार या प्रकरणात हा ताजा पुरावा असेल ज्या माध्यमातून ३९ वर्षांपूर्वी टायटलर यांनी चिथावणीखोर भाषण दिल्याचा माग काढता येईल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा