बांगलादेशात वाढलेल्या हिंसाचारामुळे शेख हसीना यांना पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावे लागले. आता हे सर्व पूर्वनियोजित असल्याचे सांगितले जात आहे. शेख हसीना यांच्या पतनामागे परकीय हात आहे का? असा प्रश्न विविध माध्यम वाहिन्यांनुसार केला जात आहे. शेख हसीनांची सत्ता उलथवून लावण्यामागे पाकिस्तानचे इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) आणि चीनचा हात आहे, असे सांगितले जात आहे. गेल्या दोन महिन्यांपासून बांगलादेशमध्ये राखीव जागांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सरकारविरोधी निदर्शनांमध्ये १०० हून अधिक लोक मारले गेले, त्यानंतर हे आंदोलन आणखीनच चिघळले. बांगलादेश लष्करातील जनरल वकार-उझ-झमान यांनी शांततेचे आवाहन केले असून अंतरिम सरकार स्थापन केले जात असल्याचे सांगितले. पण, खरंच शेख हसीना यांची सत्ता उद्ध्वस्त होण्यामागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे का? जाणून घेऊ.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा