भारत-चीन सीमारेषेवर चीनच्या हालचाली अजूनही सुरूच आहेत. भारतीय लष्कराने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक (एलएसी) शस्त्रास्त्र सज्जता आणि पायाभूत सुविधांमध्ये वाढ केली असली तरी एलएसी नजीक चीनची कुरघोडी सुरूच आहे. गेल्या आठवड्यात परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर म्हणाले की, चीनबरोबरच्या ७५ टक्के मतभेदांचे मुद्दे त्यांच्या सीमा चर्चेत सोडवले गेले आहेत. “पूर्वी दोन देशांतील संबंध सोपे नव्हते. २०२० मध्ये जे घडले ते अनेक करारांचे उल्लंघन करणारे होते. गलवान खोऱ्यात चिनी सैनिक आणि भारतीय सैनिकांची चकमक झाली होती. चीनबरोबर झालेल्या सीमारेषेवरील चर्चेत प्रगती झाली आहे. जवळपास ७५ टक्के समस्या सोडवल्या गेल्या आहेत. आम्हाला अजूनही काही गोष्टी करायच्या आहेत,” असे जयशंकर यांनी गेल्या गुरुवारी जिनिव्हा सेंटर फॉर सिक्युरिटी पॉलिसी येथे राजदूत जीन-डेव्हिड लेविट यांच्याशी केलेल्या संभाषणात सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा