जगातील मानवनिर्मित आश्चर्यांपैकी एक असणार्‍या पनामा कालव्यातून बरोबर ११० वर्षांपूर्वी १५ ऑगस्ट १९१४ रोजी पहिले जहाज गेले होते. ८३ किलोमीटरचा हा कालवा आधुनिक अभियांत्रिकी शास्त्राचा सर्वोत्कृष्ट नमूना म्हणून ओळखला जातो. या कालव्यामुळे अमेरिकेच्या अटलांटिक व पॅसिफिक किनाऱ्यामधील अंतर कमी झालेले आहे. या कालव्यामुळे न्यूयॉर्क आणि सॅन फ्रान्सिस्कोदरम्यानच्या प्रवासातील अंदाजे १२,६०० किलोमीटरचे अंतर कमी होते. तसेच पनामा हा जगातील सर्वांत महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या जलमार्गांपैकी एक आहे.

या कालव्यातून दररोज सरासरी ३६ ते ३८ जहाजे जात असतात. जागतिक व्यापाराची ८० टक्के मालवाहतूक या कालव्यातून होते. परंतु, मागील डिसेंबरमध्ये कालव्याच्या दोन्ही बाजूंना १६० हून अधिक जहाजे खोळंबली होती. त्यामुळे जागतिक व्यापारावर परिणाम झाला होता. त्यानंतर इथून जाणार्‍या जहाजांची संख्या २२ वर आली होती. दुष्काळामुळे पनामा कालवाप्रणालीच्या कार्यासाठी कृत्रिम जलाशय असलेल्या गॅटुन सरोवराच्या पाण्याच्या पातळीत घट झाल्यामुळे हे घडले आहे. आता ही वाहतूक दिवसाला ३५ जहाजांवर पुनर्संचयित केली गेली आहे. परंतु, हवामान बदलामुळे या कालव्याच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. त्यामागचे नेमके कारण काय? जाणून घेऊ.

Pakistan International Airlines Flight
पाकिस्तानच्या विमानाने तुम्ही कधी प्रवास केलाय का? प्रवाशाने शेअर केलेला Video पाहून तुमचीही झोप उडणार!
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
SYMBIOSEXUAL
तुम्ही सुद्धा ‘Symbiosexual’ आहात का? ही नवीन लैंगिक ओळख नेमकी काय आहे? इंटरनेटवर याची इतकी चर्चा का?
Puneri Pati
“उगाच पुण्याच्या पाट्या जगभर प्रसिद्ध नाहीत!” नो पार्किंगमध्ये गाडी लावणाऱ्यांना पुणेरी शैलीत टोला, पाहा पुणेरी पाटी
pakistan multinational comapny
नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांचा पाकिस्तानमधून काढता पाय; कारण काय?
Puneri pati viral for parking in his spot funny puneri pati goes viral
PHOTO: पुणेकरांचा नाद नाय! गेट समोर गाडी पार्क करणाऱ्यांना आकर्षक बक्षिसे; शेवटचं बक्षिस वाचून पोट धरुन हसाल
Man wrote message for his wife in back of the car video goes viral
किती ते प्रेम! नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून कराल कौतुक
Suraj Chavan
“जर सूरज चव्हाणने बिग बॉसची ट्रॉफी जिंकली तर मी पुढचा सीझन बघणार नाही”, असं का म्हणाली अभिनेत्री?
पनामा कालव्यात जहाजांना एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत नेण्यासाठी लॉक आणि लिफ्ट प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : भारताला अमेरिकेकडून मिळणार ‘हंटर किलर’; काय आहे MQ-9B? कोटींची गुंतवणूक करून भारत हे ड्रोन का खरेदी करत आहे?

वॉटर लॉक्सची व्यवस्था

पनामा कालवा ही दोन मोठ्या जलसंस्थांना जोडणारी पाण्याची साधी वाहिनी नाही. ती एक अत्याधुनिक, उच्च अभियांत्रिकी प्रणाली आहे. या कालव्यात जहाजांना एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत नेण्यासाठी लॉक आणि लिफ्ट प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. कारण- पनामा कालवा जोडणारे दोन महासागर एका उंचीवर नाहीत. पॅसिफिक महासागर हा अटलांटिक महासागरापेक्षा किंचित उंच आहे. त्यामुळे जहाजांना समान उंचीवर आणण्यासाठी लॉक प्रणालीचा वापर केला जाते. पनामा कालव्यामध्ये दोन्ही बाजूंना बंदिस्त बांध (लॉक्स) बांधले आहेत. या बांधांमध्ये पाणी सोडले जाते आणि आत शिरणाऱ्या जहाजांना वर चढवले जाते. त्याचप्रमाणे येथून बाहेर पडणाऱ्या जहाजांना उलट प्रक्रियेने खालीही उतरवले जाते. एकूण प्रणालीमध्ये कुलपांचे तीन संच आहेत; ज्यात एकूण १२ बंदिस्त बांध आहेत. ते कृत्रिम तलाव आणि चॅनेल वापरून वापरले जातात. कुलपांचा संच कसा कार्य करतो, ते पाहूया.

पनामा कालवा ही दोन मोठ्या जलसंस्थांना जोडणारी पाण्याची साधी वाहिनी नाही. ती एक अत्याधुनिक, उच्च अभियांत्रिकी प्रणाली आहे. (छायाचित्र-द पनामा कनाल/एक्स)

-जहाज समुद्रसपाटीवर असलेल्या बांधाच्या पहिल्या म्हणजे सर्वांत खालच्या चेंबरजवळ येते.
-जहाजाला चेंबरमध्ये जाण्यासाठी बंद केलेले गेट उघडले जाते आणि त्याच्या मागील गेट बंद केले जाते.
-पहिल्या आणि दुसऱ्या चेंबरमधील व्हॉल्व्ह पहिल्या चेंबरची पाण्याची पातळी वाढविण्यासाठी उघडला जातो.
-पाण्याची पातळी समान झाल्यावर दोन चेंबरमधील गेट उघडले जाते आणि जहाज पुढील चेंबरमध्ये प्रवेश करते.
-समान उंचीवर आणण्यासाठी ही प्रक्रिया केली जाते आणि उंची कमी करण्यासाठी याच्या उलट प्रक्रिया केली जाते.

पनामा कालव्याला कुलपांच्या या प्रणालीचा वापर करून जहाजे मार्गी लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात गोड्या पाण्याची आवश्यकता आहे. त्यातील बहुतांश पाणी गुरुत्वाकर्षण शक्तीचा वापर करून गॅटुन सरोवरातून (पंपांचा वापर न करता) पुरवले जाते. ‘द न्यूयॉर्क टाइम्स’च्या वृत्तानुसार, एक जहाज या मार्गातून जाण्यासाठी ५० दशलक्ष गॅलन (जवळजवळ २०० दशलक्ष लिटर) पाण्याची आवश्यकता असते. अशा प्रकारे न्यूयॉर्क शहरातील आठ दशलक्ष रहिवाशांनी वापरलेल्या पाण्याच्या अडीच पट जास्त पाणी हा कालवा दररोज वापरतो. गेल्या वर्षी गॅटुन सरोवरातील पाण्याची पातळी कमी झाली होती. त्याचा अर्थ असा होता की, दररोज खूप कमी जहाजे या कालव्यातून जाऊ शकत होती आणि अनेकदा जहाजांना त्यांची माल भरण्याची क्षमता कमी करावी लागली. महासागरातील पाण्याचा वापर लॉकच्या प्रणालीसाठी केला जाऊ शकतो; परंतु यामुळे गॅटुन सरोवरात क्षाराचे प्रमाण वाढेल. गॅटुन सरोवरात पनामाच्या ४.४ दशलक्ष लोकांपैकी अर्ध्याहून अधिक लोकांसाठी पिण्याच्या पाण्याचे स्रोत आहेत.

पनामा कालव्याला कुलपांच्या या प्रणालीचा वापर करून जहाजे मार्गी लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात गोड्या पाण्याची आवश्यकता असते. (छायाचित्र-रॉयटर्स)

चांगल्या पावसाचा अर्थ या वर्षी परिस्थिती अधिक चांगली आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे; परंतु हा क्षणिक दिलासा असल्याचेही ते सांगतात. हवामान बदल ही कायमस्वरूपी समस्या असून, ती मानवतेला धोक्यात आणणारी आहे. पनामामध्ये वर्षानुवर्षे पाणी कमी होत असल्याचे ऐकलेले नाही; परंतु ते आता अधिक सामान्य झाले आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पृथ्वीचे तापमान जसजसे वाढत जाईल तसतशी ही समस्या भविष्यात अधिक सामान्य होईल. “ऐतिहासिकदृष्ट्या मोठ्या एल निनो घटनांमुळे दर २० वर्षांनी सरासरी एकदा पावसाची कमतरता निर्माण व्हयची. परंतु, गेल्या २६ वर्षांतील पावसाची ही तिसरी मोठी तूट आहे. त्यामुळे असे दिसते की, पावसाचे स्वरूप बदलत आहे,” असे पनामा स्थित स्मिथसोनियन ट्रॉपिकल रिसर्च इन्स्टिट्यूटचे अनुभवी हवामान बदल तज्ज्ञ स्टीव्हन पॅटन यांनी २०२३ मध्ये ‘द गार्डियन’ला सांगितले.

हेही वाचा : पाकिस्तान बेरोजगारीच्या खाईत? बहुराष्ट्रीय कंपन्या पाकिस्तानातून का निघून जात आहेत?

वादग्रस्त उपाय

पनामा कालव्याच्या अधिकाऱ्यांनी सुचवलेले निराकरण म्हणजे रिओ इंडिओला धरण बांधून कालव्यासाठी पाण्याचा दुसरा स्रोत निर्माण करणे. गेल्या महिन्यात पनामाच्या सर्वोच्च न्यायालयाने १.६ अब्ज डॉलर्स खर्चून धरण बांधण्यासाठीचे दरवाजे उघडले. अधिकारी म्हणतात की, यामुळे किमान पुढील ५० वर्षांपर्यंतची समस्या सोडवली जाईल. मात्र, या प्रस्तावावर सगळेच खूश नाहीत. कारण- यामुळे दोन हजारांहून अधिक लोकांचे स्थलांतर करावे लागेल आणि ते लोक त्यांच्याकडे अनेक दशकांपासून असलेल्या जमिनी आणि उपजीविकेचे साधन गमावतील.