Dr. Babasaheb Ambedkar’s 3 warnings about India’s future: संविधान दिवस: मंगळवारी (२६ नोव्हेंबर) भारतीय संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संसदेच्या संयुक्त अधिवेशनात उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख करत असे म्हटले की, राजकारण्यांनी “धर्मापेक्षा देशाला महत्त्व दिले पाहिजे”. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वारंवार हे सांगितले होते की, संविधानाची कार्यक्षमता आणि प्रभाव त्या लोकांवर अवलंबून असेल, जे ते अंमलात आणतील. “… कितीही चांगले संविधान असले तरीही, ते वाईट ठरू शकते, जर त्याची अंमलबजावणी करणारे लोक वाईट असतील,” असे त्यांनी म्हटले होते. धनखड यांनी उद्धृत केलेले विधान हे २५ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेतील डॉ. आंबेडकर यांच्या समारोपाच्या भाषणातील आहे. या भाषणात त्यांनी देशाच्या भविष्याबाबत काही बाबतीत धोके व्यक्त सांगितले होते. आजच्या राजकीय मतभेदांच्या पार्श्वभूमीवर संविधानाचा वारंवार उल्लेख केला जातो, अशा वेळेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केलेल्या धोक्यांचाही प्रतिध्वनी ऐकू येतो. येथे त्यापैकी तीन धोक्यांची चर्चा केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा