-जयेश सामंत
मुंबई, ठाण्यातील मराठमोळ्या वस्त्यांमध्ये बाळसे धरलेल्या दहीहंडी, गणेशोत्सवात उत्सवात राजकीय नेत्यांचा शिरकाव तसा नवा नाही. कित्येक वर्षापासून तरुणाईला संघटित करत राजकीय ध्येय साध्य करण्यासाठी हे उत्सव साधन म्हणून उपयोगात आणले जाऊ लागले, त्यालाही आता काही दशकांचा काळ लोटला आहे. गिरणी कामगारांच्या ऐतिहासिक संपानंतर मराठीबहुल वस्त्यांमध्ये झालेले सामाजिक, राजकीय बदल आणि पुढे वेगवेगळ्या उत्सवांच्या माध्यमातून मुंबईत शिवसेनेला मिळालेल्या कार्यकर्ते, नगरसेवक, आमदार, नेत्यांच्या फौजा हा जणू राजकीय यशाचा ठराविक असा ‘फॉर्म्युला’ ठरला. महाराष्ट्राच्या ग्रामीण पट्ट्यात, विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसी राजकारणाचा सहकार पॅटर्न गाजत असताना त्याच काळात मुंबई, ठाण्यात शिवसेनेने उत्सवाच्या माध्यमातून रचलेले राजकीय यशाचे मनोरेही नेहमीच चर्चेत ठरले. एवढ्या मोठ्या संख्येने मिळत असलेली ही राजकीय ‘रसद’ पाहून इतर पक्षही उत्सवांच्या या खेळात उतरले खरे मात्र आजवर मोजके अपवाद वगळले तर शिवसेनेची ही ‘ताकद’ भेदणे फारसे कुणाला शक्य झालेले नाही ही वस्तुस्थिती आहे. राज्यात नुकत्याच घडलेल्या सत्तांतराचा केंद्रबिंदू ठरलेले आणि नव्यानेच मुख्यमंत्रीपद मिळविणारे एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या या ताकदीचा पुरेपूर अंदाज आहे. त्यामुळे शिंदे आणि त्यांच्या दिमतीला असलेल्या भाजप नेत्यांनी यंदा अगदी पद्धतशीरपणे व्यूहरचना करत या उत्सवावर स्वत:ची छाप कशी पाडता येईल अशी आखणी केलेली दिसते. ठाण्यातील दहीहंड्यांच्या निमित्ताने याची पुरेपूर प्रचीती आली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा