लोकसभा निवडणुकीसाठी सर्व प्रमुख पक्ष कंबर कसून तयार झाले आहेत. काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्ष अशा प्रमुख पक्षांनी आपापल्या जाहीरनाम्याची घोषणा केल्यानंतर आता देशातील सत्ताधारी पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीनेही आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी या दोन प्रमुख राष्ट्रीय पक्षांचा विचार प्रामुख्याने करता, काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्याला ‘न्यायपत्र’ असे म्हटले आहे; तर भाजपाने ‘संकल्प पत्र’ असे म्हटले आहे. काँग्रेसने प्रामुख्याने ‘पाच न्याय आणि २५ गॅरंटी’वर भाष्य केले आहे. २०२४ ची ही निवडणूक अनेक अर्थांनी निर्णायक मानली जात आहे. बऱ्यापैकी सर्वच प्रमुख पक्षांचे जाहीरनामे आता जनतेसमोर आले आहेत. कुणी कोणती आश्वासने दिली आहेत, त्यामध्ये फरक काय आहे आणि साम्यस्थळे काय आहेत याविषयीचा तौलनिक आढावा घेणे गरजेचे ठरते. रोजगार, आरोग्य, महिला आणि शेतकऱ्यांसंदर्भातील मुद्द्यांवर काँग्रेस आणि भाजपाने काय आश्वासने दिली आहेत याविषयी आपण आता माहिती घेणार आहोत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा