भारतीय सण हे ऋतूबदलाचे द्योतक असतात. आज जरी या सणांचे मूळ महत्त्व विस्मरणात जावून केवळ बाह्य उत्सवाचे स्वरूप शिल्लक राहिलेले असले तरी, भारतीय संस्कृतीच्या प्राचीन रचनाकारांनी निसर्गात होणाऱ्या सूक्ष्म बदलांचे निरीक्षण करून निसर्गातच आढळणाऱ्या गोष्टींच्या सहाय्याने हे सण कसे साजरे केले जावेत याची मांडणी केली होती, याला दिवाळी देखील अपवाद नाही. तेल-उटण्याने केलेले अभ्यंग स्थान, स्निग्धता वाढविणारा फराळ, दिव्यांची आरास या सर्व गोष्टींमागे निसर्गात होणारे परिवर्तन दडलेले आहे. परंतु काही गोष्टी सणाच्या निमित्ताने जोडल्या जातात, आत्मसात केल्या जातात आणि संस्कृतीचा भाग होतात. यात भल्या- बुऱ्या अशा दोन्ही परंपरांचा समावेश असतो. सध्या दिवाळीच्याच निमित्ताने एक मुद्दा गाजतो आहे, तो म्हणजे फटाक्यांचा. मुंबईत वाढलेल्या प्रदूषणामुळे न्यायालयाकडून फटाक्यांच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. यामुळे अनेक स्वरूपाच्या प्रतिक्रिया समाज माध्यमांवर उमटताना दिसतात. हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे, हिंदू सणांच्या वेळीच असे नियम कसे येतात इत्यादी. त्याच पार्श्वभूमीवर दिवाळीच्या दिवसांत फटाके वाजविणे ही परंपरा प्राचीन आहे का? हे जाणून घेणे समयोचित ठरणारे आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा