मागच्या तीन वर्षांत जगभरात काम करण्याच्या पद्धतीमध्ये कमालीचा बदल झाला आहे. करोना काळात विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी ज्या लोकांना घरून काम करणे शक्य आहे, अशा लोकांना ते करण्याची मुभा देण्यात आली. घरून काम करण्याचा पर्याय यशस्वी झाल्याचे मागच्या दोन-तीन वर्षांत पाहायला मिळाले. पण आता करोना महामारीचा शेवट झाला आहे. त्यामुळे कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा कार्यालयात बोलावण्यास सुरुवात केली आहे. आयटी क्षेत्रातील नामांकित कंपनी असलेल्या ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ने मागच्या वर्षीच सर्व कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये परतण्यासाठी अधिकृत ईमेल केला होता. आता या निर्णयाचे पालन न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा कंपनीने दिला आहे. ‘फर्स्टपोस्ट वेबसाइट’ने या विषयाच्या संदर्भात आढावा घेतला आहे. या विषयात पुढे काय होणार त्यावर टाकलेला एक दृष्टिक्षेप.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा