इंद्रायणी नार्वेकर
यंदाचा अर्थसंकल्प मांडताना पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी टॅक्टीकल अर्बनिझम म्हणजेच `लोकसहभागातून कार्यात्मक शहरीकरणा’ची संकल्पना मांडली. या नव्या संकल्पनेनुसार आता शहराचे नियोजन करण्यात येणार आहे. यंदा यासाठी ५० कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे. या नव्या संकल्पनेविषयी ….

लोकसहभागातून कार्यात्मक शहरीकरण म्हणजे काय?

Will study decision to increase height of Almatti says Radhakrishna Vikhe
अलमट्टीची उंची वाढविण्याच्या निर्णयाचा अभ्यास करणार – राधाकृष्ण विखे यांचे प्रतिपादन
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
name of a Bangladeshi was found in the voter list of Narayangaon Gram Panchayat
नाशिक जिल्ह्यातील आडगाव येथे पकडलेल्या ३ जणांनी काढले होते नारायणगाव येथे आधारकार्ड
Loksatta coverage on Mumbai BMC budget 2025 in marathi
रुपये ७४,४२७,४१,००० फक्त!, मुंबई महापालिकेच्या जवळपास पाऊण लाख कोटींच्या अजस्र अर्थसंकल्पातून होणार काय?
Vishwa Marathi Sammelan 2025
Vishwa Marathi Sammelan 2025 : अनोख्या उपक्रमाला पुणेकरांचा प्रतिसाद; तीन दिवसांत ३५ हजार पुस्तकांचे आदान-प्रदान
India Manufacturing PMI Hits Six-Month High in January
अर्थव्यवस्थेसाठी सुसंकेत, उत्पादन क्षेत्राला जानेवारीत दमदार गती; ‘पीएमआय’ सहा महिन्यांच्या उच्चांकी
Demolition drive against illegal chawls in Titwala-Manda
टिटवाळा-मांडामध्ये बेकायदा चाळींच्या विरुध्द तोडकामाची मोहीम
Loksatta Analysis in Mulund Control inflation through budget mumbai new
अर्थसंकल्पातून महागाईवर नियंत्रण कितपत?उद्या सायंकाळी मुलुंडमध्ये ‘लोकसत्ता विश्लेषणा’तून वेध

आतापर्यंत विकासकामे करताना शहरीकरणाचा विचार केला जातो. म्हणजे पूल, रस्ते, रुग्णालय, शाळा यांची उभारणी केली जाते. यापुढे जगभरात लोकसहभागातून कार्यात्मक शहरीकरण म्हणजेच नागरिकांच्याच सहभागातून  विरंगुळ्याच्या जागा, मोकळ्या जागा तयार करणे ही नवीन संकल्पना राबवली जात आहे. लोकसंख्येची घनता अधिक असलेल्या शहरांमध्ये लोकांचा, विशेषतः पादचाऱ्यांचा, सार्वजनिक परिवहन सेवेचा विचार करून नियोजन करणे हा त्यातला मुख्य भाग आहे.

मुंबईत हा प्रयोग पहिल्यांदा होत आहे का ?

मुंबईत आतापर्यंत अनेक ठिकाणी लहान स्तरावर असे प्रयोग करण्यात आले आहेत. परंतु, संपूर्ण मुंबईचा विचार करून ही संकल्पना राबवण्यासाठी धोरण म्हणून स्वीकारणारे मुंबई हे पहिले शहर आहे. अर्थसंकल्पात या संकल्पनेकरीता तरतूदही करण्यात आल्यामुळे यंदा प्रथमच स्वतंत्र लेखाशीर्ष सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे या संकल्पनेला चालना मिळण्यास मदत होणार आहे.

कोणत्या प्रकारची कामे यात अंतर्भूत आहेत?

लोकसहभागातून कार्यात्मक शहरीकरणामध्ये शहरातील पडीक जागांचा नागरिकांसाठीच कल्पकतेने वापर करण्यावर मुख्य भर असेल. आतापर्यंत पालिकेच्यावतीने जागांच्या सुशोभीकरणावर भर दिला जात होता. पण यापुढे त्या जागा नागरिकांना कशाप्रकारे वापरता येतील हेच या कार्यात्मकतेमध्ये पाहिले जाणार आहे. याचे काही प्रयोग मुंबईत आधीच झाले आहेत. सीएसएमटी स्थानक परिसरात मधल्या चौकात पालिकेने त्रिकोणी आकाराची जागा तयार करून तेथे सेल्फी पॉईंट तयार केला आहे, ताडदेवला भल्या मोठ्या वाहतूक बेटावर उद्यानच साकारण्यात आले असून त्यात नागरिकांना बसण्याचीही सोय आहे, दादर आणि गिरगाव चौपाटीवर पर्जन्यजलवाहिन्यांच्या पातमुखांवर दर्शक गॅलरी उभारण्यात आली आहे.

भविष्यात आणखी कोणत्या संकल्पना राबवल्या जाणार ?

उड्डाणपूलांखालील जागांबाबत आतापर्यंत काहीही धोरण नव्हते मात्र यापुढे या सर्व जागा मोकळ्या करून त्यावर उद्याने, खेळण्यासाठीच्या जागा, धावपट्ट्या तयार करण्यात येणार आहेत. संपूर्ण मुंबईत ही संकल्पना राबवली जाणार आहे. प्रत्येक विभागात अशा पडीक जागांचा शोध घेऊन त्याचा कल्पकतेने वापर करण्यावर भर दिला जाणार आहे. त्याचबरोबर शाळांच्या आजूबाजूचा परिसर सुरक्षित करण्यासाठी पदपथ, सिग्नल यंत्रणा, रस्त्यांवर रंगीत पट्टे असेही नियोजन केले जाणार आहे. मैदानांच्या सभोवती भिंतींऐवजी आरपार पाहता येईल असे रेलिंग बसवणे, ज्यामुळे दृष्टीक्षेत्र वाढते, असेही प्रयोग केले जाणार आहेत.

पादचारी प्रथम…

रस्त्यावरून चालण्याचा पहिला हक्क पादचाऱ्यांचा असला तरी वाहनांच्या गर्दीमुळे पादचारी भांबावलेले असतात. मात्र नव्या संकल्पनेत रस्त्यावरील वाहतूक काही काळ थांबवून लोकांना त्याचा वापर करण्यासाठी संडे स्ट्रीट सारखे उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. चांगले, चालण्यायोग्य पदपथ या प्रकल्पात बांधण्यात येतील. सार्वजनिक परिवहन सेवा बळकटीकरणावर भर दिला जाणार असून बस थांबेही सुशोभित केले जातील.

शौचालयांचेही स्वरूप बदलणार

गर्दीच्या ठिकाणी शौचालय बांधणे हा देखील याच प्रकल्पाचा भाग आहे. मात्र यापुढे सार्वजनिक शौचालयेही बहुपयोगी असावीत असे नियोजन करणे अपेक्षित आहे. मुंबईत धारावी, अंधेरी अशा ठिकाणी प्रसाधनगृहात आंघोळ व कपडे धुण्याचीही सुविधा देण्यात आली आहे. तृतीयपंथीय, अपंग यांच्यासाठी स्वतंत्र शौचकूपाची व्यवस्था येथे केली जाणार आहे. एकूणात कार्यात्मकता वाढल्याने शहर नागरिकांसाठी अधिक सुसह्य व आनंददायी असणे अपेक्षित आहे.

indrayani.narvekar@expressindia.com

Story img Loader