अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला. त्यामध्ये २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी सरकारच्या अर्थसंकल्पापूर्वी अर्थव्यवस्थेच्या स्थितीचा तपशील देण्यात आला आहे. या सर्वेक्षणात देशातील घर घेण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण कोणते याची माहिती देण्यात आली आहे. अहवालानुसार, घरांच्या विक्रीला चालना देण्यासाठी दिल्ली, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र यासारख्या विविध राज्य सरकारांनी दर आणि मुद्रांक शुल्क कमी केले होते.

करोनाच्या पहिल्या लाटेत जवळपास सर्वच शहरांमध्ये गृहनिर्माण व्यवहारात घट झाली. तर, कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेदरम्यान, मुंबई, ठाणे, पुणे, नोएडा, हैदराबाद आणि बंगळुरू यांसारख्या अनेक शहरांमधील घरांचे व्यवहार करोनापूर्व काळाच्या तुलनेत वाढले. गांधीनगर, अहमदाबाद, चेन्नई, रांची, दिल्ली आणि कोलकाता यांसारख्या शहरांमध्ये करोनापूर्व स्तरावर दुसऱ्या करोनाच्या लाटेदरम्यान गृहनिर्माण व्यवहारात घट झाली. मात्र, ही घट पहिल्या करोना लाटेत झालेल्या घसरणीपेक्षा खूपच कमी आहे.

Flats in Bhandup Mulund Juhu and Malad for project affected people mumbai print news
मुंबई: प्रकल्पबाधितांसाठी भांडुप, मुलुंड, जुहू आणि मालाडमध्ये सदनिका
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
builders January
वर्षाची सुरुवात बांधकाम व्यावसायिकांसाठी सकारात्मक, मागील १३ वर्षांतील जानेवारीमधील घरविक्रीचा उच्चांक
Tax Benefits For House Owners
Union Budget 2025 : दोन घरांचे मालक असणाऱ्यांना अर्थसंकल्पातून मोठी भेट, जाणून घ्या कशी मिळणार दोन्ही घरांवर कर सवलत
Economic Survey FY 2025-26 India GDP Growth Rate
केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून चालू वर्षाचा आर्थिक विकास दर जाहीर; संसदेत पाहणी अहवाल सादर
Loksatta Analysis in Mulund Control inflation through budget mumbai new
अर्थसंकल्पातून महागाईवर नियंत्रण कितपत?उद्या सायंकाळी मुलुंडमध्ये ‘लोकसत्ता विश्लेषणा’तून वेध
House prices in Mumbai Thane increased by 18 percent last year
मुंबई ठाण्यातील घरांच्या किंमतीत गेल्यावर्षी तब्बल १८ टक्के वाढ
Budget 2025
Union Budget 2025 : ‘हे’ १० उपाय केल्यास रिअल इस्टेट क्षेत्र घेईल भरारी; घरंही होतील स्वस्त, अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा

अहवालानुसार, करोनाकाळात अद्याप नोकरीची अनिश्चितता कायम आहे, ज्यामुळे मासिक हप्त्यासारखी चिंता कायम आहे. मार्च २०१९ च्या तुलनेत मध्यमवर्गीयांचे घर घेण्यासाठी कर्ज घेण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. हे गेल्या चार वर्षांच्या पातळीपेक्षा कमी आहे. गृहकर्जामध्ये नोव्हेंबर २०२१मध्ये आठ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली.  नोव्हेंबर २०२० मधील वार्षिक ८.४ टक्क्यांच्या वाढीपेक्षा किरकोळ कमी आहे. गृहकर्ज मार्च २०१८ मध्ये १३.३ टक्के, मार्च २०१९ मध्ये २१.१ टक्के, मार्च २०२० मध्ये १३.३ टक्के आणि मार्च २०२० मध्ये ९.१ टक्क्यांनी वाढले. कमी व्याजदर आणि वाजवी मालमत्तेच्या किमती यामुळे रिअल इस्टेट क्षेत्राला बसलेला धक्का कमी झाला. वर्षभरात, राज्य सरकारांनी मुद्रांक शुल्कात कपात केली तर विकासकांनी घर खरेदीदारांना प्रोत्साहन आणि सवलती देऊ केल्या.

शेअर बाजारावर प्रभाव

आर्थिक सर्वेक्षणानुसार, एप्रिल-नोव्हेंबर २०२१ मध्ये ७५ कंपन्यांच्या आयपीओने ८९,०६६ कोटी रुपये उभे केले, तर २९ कंपन्यांनी एप्रिल-नोव्हेंबर २०२० या कालावधीत १४,७३३ कोटी रुपये उभे केले, जे निधी उभारणीत ५०४.५ टक्क्यांनी वाढ दर्शवते.

या सर्वेक्षणात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण कार्यक्रमाची देखील माहिती देण्यात आली. २०२०-२१ मध्ये ३३.९९ लाख घरे आणि २५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत २६.२० लाख घरे पूर्ण झाली यावर प्रकाश टाकण्यात आला. प्रधानमंत्री आवास योजना शहरीसाठी, सर्वेक्षणानुसार १४.५६ लाख घरे आर्थिक वर्ष २०२१ मध्ये पूर्ण झाली होती. २०२१-२२ आर्थिक वर्षात डिसेंबर २१ पर्यंत ४.४९ लाख घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

Story img Loader