इंग्लंडमध्ये सुरु असणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेमध्ये सोमवारी भारताने ऐतिहासिक विजय मिळवला. ५० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सोमवारी ओव्हलवर भारतीय संघाने विजयी पताका फडकावला. भारतीय संघ सपाट खेळपट्टीवर चांगली गोलंदाजी करु शकणार नाही असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र भारतीय गोलंदाजांनी हा अंदाज चुकीचा ठरवत इंग्लंडच्या संघाला ऑल आऊट करण्याचा पराक्रम केला. यामध्ये सर्वच भारतीय गोलंदाजांनी भन्नाट गोलंदाजी केली असली तरी जसप्रीत बुमराने लंच ब्रेकनंतर केलेल्या भन्नाट गोलंदाजीमुळे सामन्याचं पारडं भारताच्या बाजूने झुकण्यास सुरुवात झाली. पण बुमरासमोर जगभरातील फलंदाज फारसे प्रभावी का ठरत नाही याचं गुपित माजी गोलंदाज आणि चेन्नई सुपर किंग्स संघाचा गोलंदाज प्रशिक्षक असणाऱ्या लक्ष्मीपती बालाजीने द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलंय. ओव्हलच्या सामन्यात बुमराने टाकलेल्या दोन खास चेंडूंबद्दल बालाजीने सविस्तर माहिती दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा