नाणेफेक जिंकणारा संघच सामना जिंकणार ही या मालिकेतील प्रथा भारताने अहमबादमधील मैदानावर झालेल्या सामन्या गुरुवारी मोडीत काढत प्रथम फलंदाजी करुन सामना जिंकला. भारताने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेमध्ये २-२ अशी बरोबर करण्यात यश मिळवलं ते सूर्यकुमार यादवच्या दमदार खेळीच्या जोरावर. भारताने इंग्लंडविरुद्धचा चौथा सामना आठ धावांनी जिंकल्याने पाचवा टी-२० सामना मालिका कोण जिंकणार हे ठरवण्यासाठी निर्णायक ठरणार आहे. मात्र या चौथ्या सामन्यादरम्यान तिसरे पंच विरेंद्र शर्मा यांनी दिलेले काही निर्णय सोशल नेटवर्किंगवर चर्चेचा विषय ठरले. खास करुन चांगली फलंदाजी करत असणाऱ्या सूर्यकुमारचा झेल हा सॉफ्ट सिग्नलच्या आधारावर तसेच कनक्युजीव्ह एव्हिडन्सच्या आधारावर योग्य असल्याचा निर्णय दिल्याने शर्मा यांच्यावर भारतीय क्रिकेट चाहत्यांनी चांगलीच टीका केली. या निर्णयानंतर सॉफ्ट सिग्नल हा विषय ट्विटरच्या टॉप ट्रेण्डमध्ये आला. मात्र सॉफ्ट सिग्नल म्हणजे नेमकं काय हे अनेकांना ठाऊक नाहीय. त्यामुळेच या लेखामध्ये आपण या नियमासंदर्भात जाणून घेणार आहोत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा