आयएनएस विक्रांत या भारतीय बनावटीच्या विमानवाहू नौकेच्या प्रारंभीच्या दोन्ही चाचण्या यशस्वी झाल्यानंतर आता तिसरी चाचणी सुरू झाली आहे. पुढील काळात विविध पातळीवर ही प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर या वर्षाच्या उत्तरार्धात आयएनएस विक्रांत भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट होईल. या विमानवाहू नौकेने काय साध्य होणार, या विषयीच्या प्रश्नांचा हा शोध.

विमानवाहू नौकेचे महत्त्व काय ?

Maharashtra Kesari 2025
Maharashtra Kesari 2025 : पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी; सोलापूरचा महेंद्र गायकवाड पराभूत
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Bullet train
महसूल आणि खर्च: देखाव्यापेक्षा सुधारणा हव्या आहेत…
Defence Budget 2025
Budget 2025: संरक्षण क्षेत्रासाठी सर्वाधिक तरतूद; कृषी, आरोग्य, शिक्षण खात्यावर किती खर्च केला जाणार? वाचा
Economic Survey Report predicts possible growth rate of 6 8 percent
६.८ टक्क्यांचा विकासवेग शक्य
Economic Survey FY 2025-26 India GDP Growth Rate
केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून चालू वर्षाचा आर्थिक विकास दर जाहीर; संसदेत पाहणी अहवाल सादर
Loksatta Analysis in Mulund Control inflation through budget mumbai new
अर्थसंकल्पातून महागाईवर नियंत्रण कितपत?उद्या सायंकाळी मुलुंडमध्ये ‘लोकसत्ता विश्लेषणा’तून वेध
ST Corporation increased travel fare from January 24 midnight price of free money has increased
राज्यात घाऊक भाडेवाढ, एसटीचा प्रवास १५ टक्क्यांनी महाग; रिक्षा-टॅक्सीच्या दरांत ३ रुपये वाढ

लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टरचा ताफा घेऊन समुद्रात तरंगणारे अवाढव्य शहर म्हणजे विमानवाहू युद्धनौका. आपल्या भूमीपासून दूरवरील युद्ध लढण्यासाठी तिचा उपयोग होतो. समुद्रात खोलवर (निळ्या पाण्यातील) कार्यवाहीसाठी नौदलास प्रचंड शक्ती देणारे हे अस्त्र आहे. लढाऊ विमानांमुळे तिची मारक क्षमता कित्येक पटीने वाढते. विमानवाहू नौकेच्या दिमतीला क्षेपणास्त्र आणि इतर आयुधांनी सुसज्ज विविध युद्धनौका, पाणबुडी, इंधन पुरविणारी जहाज असतात. समुद्रातील धोक्यांपासून युद्धनौकेच्या संरक्षणाबरोबर त्या दस्त्याचा युद्धात प्रभावीपणे वापर केला जातो.

इतिहासातील कामगिरी कशी ? 

दुसऱ्या महायुद्धात अशा विमानवाहू युद्धनौकेचा पहिल्यांदा वापर झाला होता. जपानच्या युद्धनौकेवरील लढाऊ विमानांनी पर्ल हार्बर या अमेरिकेच्या नौदल तळावर बॉम्ब वर्षाव केल्याचा इतिहास आहे. आपले प्रभुत्व राखण्यासाठी मोठ्या राष्ट्रांना विमानवाहू युद्धनौकेचे महत्त्व कळले. त्यांनी तिची बांधणी, ताफ्यात समाविष्ट करण्यावर लक्ष केंद्रित केले. मुळात विमानवाहू नौका बाळगणे प्रचंड खर्चिक विषय आहे. तिच्या संचलनासाठी एक ते दीड हजार अधिकारी, नौसैनिकांची गरज भासते. ताफ्यातील विमाने, युद्धनौकांचा दस्ता वेगळाच. आर्थिकदृष्ट्या संपन्न राष्ट्रे असा खर्च पेलू शकतात. त्यायोगे त्यांनी जगात आपला दबदबा निर्माण केला. आज विमानवाहू नौका ताफ्यात बाळगणे, तिचे संचलन जागतिक पटलावर कुठल्याही नौदलासाठी अतिशय प्रतिष्ठेचे मानले जाते.

युद्धनौकेची गरज का ?

भारतीय नौदलाच्या ताफ्यात सध्या आयएनएस विक्रमादित्य ही एकमेव युद्धनौका आहे. रशियाकडून ती प्रचंड किंमत मोजून घेतलेली आहे. नौदलाची आयएनएस विराट ही युद्धनौका तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर जुलै २०१६ निवृत्त झाली. त्याआधी ‘आयएनएस विक्रांत’ याच नावाची विमानवाहू नौका, १९७१ ते २०१२ अशी सेवा बजावून निवृत्त झाली. देशाला पूर्व आणि पश्चिमेकडे विस्तीर्ण किनारपट्टी लाभलेली आहे. सभोवतालची बदलती परिस्थिती आणि आव्हाने, चीन आणि पाकिस्तानकडून निर्माण होणारे धोके, व्यापारी मार्गांची सुरक्षा लक्षात घेऊन दोन्ही क्षेत्रातील नौदल मुख्यालयांकडे प्रत्येकी एक आणि पर्यायी स्वरूपात एक अशा एकूण तीन विमानवाहू नौकांची गरज तज्ज्ञांकडून वारंवार मांडली गेली. भारतीय नौदलाने २०२७ पर्यंत युद्धनौकांचा ताफा १७० पर्यंत विस्तारण्याचे नियोजन केलेले आहे. त्यामध्ये तिसरी युद्धनौकाही समाविष्ट करण्यावर विचार होत आहे.

विमानवाहू युद्धनौकेची बांधणी भारतातच होण्याचे महत्त्व काय ?

विमानवाहू नौका ताफ्यात बाळगून तिचे संचलन करणारे जगात बरेच देश आहेत. पण तिच्या बांधणीची क्षमता राखणारे काही मोजकेच देश आहेत. नव्या ‘आयएनएस विक्रांत’ या विमानवाहू नौकेच्या बांधणीद्वारे भारत अशा निवडक राष्ट्रांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. शेजारील चीनने विमानवाहू नौका बांधणीची क्षमता काही वर्षांपूर्वी प्राप्त केली होती. चीनच्या तिसऱ्या युद्धनौकेचे पुढील वर्षात जलावतरण होण्याच्या मार्गावर आहे. भारतीय नौदल आणि कोचीन शिपयार्डचा विमानवाहू नौका बांधणीचा हा पहिलाच प्रयत्न आहे.या युद्धनौकेची रचना, बांधणी आणि त्यावरील प्रणालींचे एकत्रीकरण हे सर्व काम देशात झाले. युद्धनौकेत ७६ टक्क्यांहून अधिक स्वदेशी सामग्रीचा वापर करण्यात आला. त्यातून देशातील लहान-मोठ्या शेकडो उद्योगांना नव्या संधी उपलब्ध झाल्या. या युद्धनौकेची बांधणी, नौदलाची गरज देशांतर्गत पूर्ण होऊन परदेशांवरील अवलंबित्व कमी करणारी ठरली.

aniket.sathe@expressindia.com

Story img Loader