मंगल हनवते
वसई-विरार आणि मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर आहे. अशात येथील लोकसंख्या वाढत असून भविष्यात पाणी टंचाई गंभीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सध्याची आणि भविष्यातील या दोन्ही पालिका क्षेत्रातील २७ गावांचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठा प्रकल्प प्रस्तावित होता. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) हा प्रकल्प राबविण्यात येत असून आतापर्यंत संपूर्ण प्रकल्पाचे ७२ टक्के काम पूर्ण झाले आहे. यातील वसई-विरार अशा पहिल्या टप्प्यातील ८३ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे नोव्हेंबरपासून वसई-विरारला सूर्या प्रकल्पातून पाणी पुरवठा सुरू होणार आहे. मीरा-भाईंदर या दुसऱ्या टप्प्याचे ३० टक्के काम पूर्ण झाले असून हा टप्पा जून २०२३ मध्ये पूर्ण होणार आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यास मीरा-भाईंदरला मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. या दोन पालिका क्षेत्रातील २७ गावांची तहान भागविणारा सूर्या प्रादेशिक पाणी प्रकल्प नेमका आहे तरी काय, याचा हा आढावा…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा