करोना काळात लॉकडाउनमुळे सामान्य जनतेला महागाईचा सामना करावा लागत आहे. त्यातच पेट्रोलच्या दरांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. निवडणुकांनंतर तेलांचे भाव पुन्हा वाढले असून अनेक राज्यांमध्ये १०० रुपयांच्या वर किंमती गेल्या आहेत. देशातील वाढत्या पेट्रोल डिझेलच्या किमतीवरुन काँग्रेससोबत सर्वच पक्षांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी(यूपीए) सरकारच्या काळात आंतराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती वाढलेल्या असताना देखील डॉ. मनमोहन सिंह यांच्या काळात पेट्रोल डिझेलचे दर नियंत्रणात होते. आता आंतराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती कमी असताना देखील पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. मात्र आता भाजपाकडून काँग्रेसने तेल कंपन्यांना दिलेल्या ऑईल बॉन्डचे पैसे केंद्र सरकारला भरावे लागत असल्याने तेलाच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याचा आरोप केला आहे. मात्र हे ऑईल बॉन्डचे प्रकरण नेमकं काय आहे हे जाणून घेऊया..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा