साधारणपणे २००८-०९ च्या सुमारास भारतीय क्रिकेट वर्तुळात अशी एक चर्चा परसली होती की, राजस्थान रॉयल्सचा अतुल शर्मा नावाचा गोलंदाज प्रत्येक चेंडू ताशी १५० किमीच्या वेगाने टाकतो. अतुल शर्माच्या मुलाखतींचे व्हिडीओ अजून यु ट्यूबवर बघायला मिळतील ज्यात तो जिममध्ये आपले स्नायू फुगवताना, कुऱ्हाडीनं लाकडं तोडताना आणि भालाफेक करावी त्या प्रकारे धावत जाऊन चेंडू कसा टाकतो ते दाखवताना दिसेल. अर्थात, अतुल शर्माचं वलय लवकरच कमी झाले आणि तितक्या गतीने गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाची प्रतीक्षा सुरू राहिली. पण, तब्बल एका दशकानंतर उमरान मलिकने सातत्याने ताशी १५० किमीच्या गतीने चेंडू टाकले आणि भारतीयांना पुन्हा अतुल शर्मा मिळाल्याचा दिलासा मिळाला. विशेष म्हणजे जम्मूतील एका फळविक्रेत्याचा मुलगा असलेला उमरान काही वर्षांपूर्वीपर्यंत देशातल्या लाखो क्रिकेटर्सप्रमाणे फक्त टेनीस क्रिकेट खेळायचा, त्यामुळे बालपणापासून प्रख्यात प्रशिक्षकांकडे प्रशिक्षण वगैरे घेऊन तयार झालेला हा गोलंदाज नाहीये.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा