काही वर्षांपासून खोट्या बातम्या देणे आणि अपप्रचार करणे याविरोधात देशभरातल्या विविध राज्यांतील पोलिसांनी मोठ्या कारवाया केल्या आहेत. या आठवड्यात कर्नाटक पोलिसांनी एका टीव्ही वृत्तनिवेदकावर कारवाईचा बडगा उगारल्याचे प्रकरण ताजे आहे. सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी गावात सोशल मीडियावर चुकीची आणि भावना भडकवणारी पोस्ट टाकल्यावरून एका समाजाच्या वस्तीवर हल्ला करण्यात आला; ज्यामध्ये दोन लोकांचा मृत्यू झाला. खोट्या बातम्या किंवा दिशाभूल करणाऱ्या बातम्या देणे ही जगभरातील एक मोठी समस्या बनली आहे. तसेच चुकीची माहिती किंवा अपप्रचार करण्याचीही समस्या गंभीर होत आहे. भारतीय दंडविधान आणि माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० नुसार वरील दोन्ही प्रकारचे गुन्हे शिक्षेस पात्र आहेत. अपप्रचारामध्ये (Disinformation) खोटी माहिती असल्याचे मानले जाते आणि कुणाला तरी हानी पोहोचवण्याच्या हेतूने जाणूनबुजून अशी माहिती तयार केलेली असते किंवा तशी तीप्रसारित केली जाते. तर चुकीची माहिती (Misinformation) पसविण्याच्या प्रकारात हेतू अनुपस्थित (कोणताही हेतू न बाळगता प्रसारित होणे) असल्याचे मानले जाते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा