जुलै २०१८ ते जुलै २०१९ या कालावधीत महाराष्ट्रात अनेक भागात दुष्काळाची परिस्थिती होती. प्रदीर्घ दुष्काळाच्या छायेत ऑक्टोबर २०१९ मध्ये महाराष्ट्र राज्याच्या निवडणुका पार पडल्या होत्या. सर्वाधिक प्रभावित मराठवाडा भागात आणि शेजारील अहमदनगर व सोलापूर या जिल्ह्यांमध्ये ११ लाखांहून अधिक गुरांना आश्रय देणाऱ्या सरकारी अनुदानित चारा छावण्या उशिरा म्हणजे सप्टेंबरपर्यंत कार्यरत होत्या. जनावरांना संपूर्ण ऊसही खायला दिला जात होता; ज्याचा दर गिरण्यांनी दिलेल्या दरापेक्षा चारा म्हणून जास्त होता. एप्रिल ते मे २०२४ च्या लोकसभा निवडणूक काळातही चित्र फारसे वेगळे नव्हते. २०२३ मध्ये महाराष्ट्रात नैर्ऋत्य (जून-सप्टेंबर) आणि ईशान्य मोसमी पाऊस (ऑक्टोबर-डिसेंबर) हंगाम होता. त्यानंतर जानेवारी-फेब्रुवारी २०२४ मध्ये हिवाळी पाऊस पडला आणि मार्चच्या सुरुवातीलाच पारा ४० अंश सेल्सिअस इतका ओलांडला गेला. मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी राज्यातील शेतीचे चित्र वेगळे आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा