जुलै २०१८ ते जुलै २०१९ या कालावधीत महाराष्ट्रात अनेक भागात दुष्काळाची परिस्थिती होती. प्रदीर्घ दुष्काळाच्या छायेत ऑक्टोबर २०१९ मध्ये महाराष्ट्र राज्याच्या निवडणुका पार पडल्या होत्या. सर्वाधिक प्रभावित मराठवाडा भागात आणि शेजारील अहमदनगर व सोलापूर या जिल्ह्यांमध्ये ११ लाखांहून अधिक गुरांना आश्रय देणाऱ्या सरकारी अनुदानित चारा छावण्या उशिरा म्हणजे सप्टेंबरपर्यंत कार्यरत होत्या. जनावरांना संपूर्ण ऊसही खायला दिला जात होता; ज्याचा दर गिरण्यांनी दिलेल्या दरापेक्षा चारा म्हणून जास्त होता. एप्रिल ते मे २०२४ च्या लोकसभा निवडणूक काळातही चित्र फारसे वेगळे नव्हते. २०२३ मध्ये महाराष्ट्रात नैर्ऋत्य (जून-सप्टेंबर) आणि ईशान्य मोसमी पाऊस (ऑक्टोबर-डिसेंबर) हंगाम होता. त्यानंतर जानेवारी-फेब्रुवारी २०२४ मध्ये हिवाळी पाऊस पडला आणि मार्चच्या सुरुवातीलाच पारा ४० अंश सेल्सिअस इतका ओलांडला गेला. मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी राज्यातील शेतीचे चित्र वेगळे आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी राज्यातील शेतीचे चित्र वेगळे आहे. राज्याच्या चारही हवामानशास्त्रीय उपविभागांनी दिलेल्या माहितीनुसार विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व कोकण या भागांत अतिरिक्त (दीर्घ कालावधीच्या सरासरीपेक्षा जास्त) मान्सून पाऊस पडत आहे. त्यामुळे जायकवाडी, भीमा, मुळा व पेंच हे राज्यातील प्रमुख जलाशय पूर्णपणे भरण्यास मदत झाली आहे आणि त्यामुळे आगामी रब्बी (हिवाळी-वसंत ऋतू) पीक हंगामाचीही आशा आहे.

२०२४ च्या महाराष्ट्र राज्याच्या निवडणुकीदरम्यान पूर्वीच्या दोन निवडणुकांच्या तुलनेत शेतकर्‍यांच्या समस्या कमी आहेत. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हेही वाचा : कमी झोपेमुळे मेंदू वेळेआधी वृद्ध होतो? नवीन अभ्यास काय सांगतो?

महाराष्ट्रातील निवडणूक आणि शेती समस्या

सोप्या भाषेत सांगायचे, तर २०२४ च्या महाराष्ट्र राज्याच्या निवडणुकीदरम्यान पूर्वीच्या दोन निवडणुकांच्या तुलनेत शेतकर्‍यांच्या समस्या कमी आहेत. म्हणजेच काय तर महाराष्ट्रातील शेतीची एकूण परिस्थिती चांगली आहे. २०२३-२४ मध्ये महाराष्ट्राच्या सकल राष्ट्रीय उत्पादन म्हणजेच जीडीपीमध्ये कृषी क्षेत्राचा वाटा फक्त ११.२ टक्के होता, जो संपूर्ण भारताच्या सरासरी १७.७ टक्क्यांच्या खाली आहे. २०२३-२४ च्या अधिकृत नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षणानुसार, राज्याच्या ४३.२ कामगारांना रोजगार मिळाला, जो राष्ट्रीय सरासरी ४६.१ टक्क्यांपेक्षा किरकोळ कमी आहे. तसेच २०२१-२२ साठीच्या नवीनतम नाबार्डच्या अखिल भारतीय ग्रामीण आर्थिक सर्वेक्षण अहवालातून महाराष्ट्रातील ५९ टक्के ग्रामीण कुटुंबांचा व्यवसाय शेती असल्याचे समोर आले आहे. म्हणजेच त्यांच्या उत्पन्नातील महत्त्वपूर्ण वाटा शेतीमधून येतो आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये निवडणुकीत शेतीला अधिक महत्त्व आहे. आताच्या या पार्श्वभूमीचा राजकीय कथन आणि लोकांच्या भावना यांवर परिणाम होऊ शकतो.

(छायाचित्र-लोकसत्ता डिजिटल टिम)

महाराष्ट्रात सर्वांत जास्त कोणत्या पिकाला महत्त्व असेल तर ते म्हणजे ऊस. महाराष्ट्र हे भारतातील सर्वांत मोठे साखर उत्पादक राज्य आहे. मात्र, २०२४-२५ या काळात (सप्टेंबर-ऑक्टोबर) उत्तर प्रदेश अव्वल स्थानावर आहे. गेल्या वर्षीचा दुष्काळ याला कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. ऊस हे १२-१८ महिने कालावधीचे पीक आहे. गिरण्यांचा गाळप कालावधी पुढील महिन्यापासून सुरू होईल. महाराष्ट्रातील शेतकरी एक तर १२ महिन्यांसाठी म्हणजेच जानेवारीत किंवा १५ महिन्यांच्या पूर्वहंगामी (जुलै-डिसेंबर) किंवा १८ महिन्यांच्या आडसाली (एप्रिल-जून) ऊसाची लागवड करतात. या वेळच्या चांगल्या पावसाचा फायदा २०२५-२६ च्या साखर वर्षात गाळप झालेल्या ऊसालाच झाल्याचे दिसून येईल.

महाराष्ट्रात साखरेसह ज्वारीलाही तितकेच महत्त्व

पश्चिम महाराष्ट्र (अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर) आणि लगतच्या मराठवाडा विभागातील उस्मानाबाद, लातूर व बीड या जिल्ह्यांमध्ये ऊसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. पण, महाराष्ट्र केवळ आघाडीचे साखर उत्पादक राज्यच नाही, तर ज्वारी, कांदा, द्राक्षे व डाळिंबाच्या उत्पादनातही पहिल्या क्रमांकावर आहे आणि कापूस उत्पादनात नंबर एकवर असणार्‍या गुजरातनंतर, सोयाबीन व चणा उत्पादनात नंबर एकवर असणार्‍या मध्य प्रदेशनंतर तूरडाळ उत्पादनात नंबर एकवर असणार्‍या कर्नाटकनंतर आणि संघटित दूध खरेदी गुजरातनंतर महाराष्ट्र दुसर्‍या क्रमांकावर आहे. ज्वारीची लागवड संपूर्ण महाराष्ट्रात मुख्य अन्नधान्य म्हणून केली जाते.

तक्ता दर्शवितो की, पश्चिम महाराष्ट्र राज्याचे दूध उत्पादन केंद्र आहे. गृहनिर्माण प्रमुख सहकारी (गोकुळ, वारणा व राजारामबापू), तसेच खासगी (सोनई, चितळे, श्रेबर डायनॅमिक्स, पराग व प्रभात) क्षेत्रातील दुग्धशाळा येथे आहेत. कापसाची लागवड प्रामुख्याने खान्देश (जळगाव-धुळे), मराठवाडा व पश्चिम विदर्भ (अमरावती विभाग अधिक वर्धा-नागपूर) येथे केली जाते. मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ हे सोयाबीन, अरहर/तूर व चणा या पिकांसाठी मुख्य लागवडीचे क्षेत्र आहेत. बागायती पिके, कांदा, टोमॅटो व द्राक्षांसाठी उत्तर महाराष्ट्र (विशेषतः नाशिक); केळीसाठी जळगाव; डाळिंबासाठी सोलापूर आणि आंब्यासाठी कोकण (रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड) ही प्रमुख लागवडीची क्षेत्रे आहेत. ठिबक सिंचन प्रणाली, ऊतीसंवर्धित लागवड साहित्य, विशेष पाण्यात विरघळणारी व द्रव स्वरूपातील खते (सामान्य युरिया किंवा डाय-अमोनियम फॉस्फेटच्या विरुद्ध) किंवा बुरशीनाशके असोत, बागायती शेतीमध्ये मोठी गुंतवणूक करावी लागते.

सोयाबीनचा प्रतिएकर उत्पादन खर्च केवळ १५ ते २० हजार रुपये, तर कांद्यासाठी ४५ ते ५० हजार रुपये आहे, द्राक्षांसाठी १-१.२५ लाख रुपये व डाळिंबासाठी १.७५-२ लाख रुपये आहे. परंतु, सोयाबीनचे सरासरी प्रतिएकर उत्पादन ०.५-०.६ टन इतके कमी आहे. कांद्याचे उत्पादन ६-७ टन व द्राक्षांचे ९-१० टन आहे.

पिकांच्या किमतींचाही प्रभाव

लातूरच्या बाजारात सरासरी ४,३५० ते ४,४०० रुपये प्रति क्विंटल दराने विकल्या जाणार्‍या सोयाबीनचे उदाहरण घेतल्यास ते सरकारच्या ४,८९२ रुपयांच्या किमान आधारभूत किमतीपेक्षा (एमएसपी) कमी आहे आणि गेल्या वर्षीचा बाजार दर ४,६५० ते ४,७०० प्रति क्विंटल या वेळी आहे. त्याचप्रमाणे यवतमाळमध्ये कापूस ६,५०० ते ६,६०० रुपये प्रति क्विंटल मिळत आहे; जो एक वर्षापूर्वी ६,८०० ते ६,९०० रुपये होता आणि त्याची किमान आधारभूत किंमत ७,१२१ रुपये होती.

जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील काजळा गावातील शेतकरी बाळासाहेब डाके सांगतात की, गेल्या एका वर्षात कापसाची काढणी/वेगणी खर्च सात रुपयांवरून १२ रुपये प्रति किलोपर्यंत वाढला आहे. सत्ताधारी भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीची लाडकी बहीण योजना त्यासाठी कारणीभूत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या योजनेत २.५ लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना दरमहा १,५०० रुपये रोख हस्तांतरित केले जातात. या योजनेमुळे शेतमजुरांनी त्यांचे दिवस किंवा कामाचे तास कमी केले आहेत, असा दावा डाके यांनी केला आहे. परिणामी, शेतमजुरांच्या टंचाईमुळे वेतन वाढले आहे.

हेही वाचा : खलिस्तानींकडून कॅनडातील भारतीय विद्यार्थ्यांना गटात सामील होण्याची धमकी? नेमके प्रकरण काय?

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी चालू खरीप हंगामात सोयाबीनची विक्रमी ५१.६ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली आहे. मागील वर्षी कापसाची लागवड ४२.२ लाख हेक्टरवर करण्यात आली होती, जी आता कमी करून ४०.९ लाख हेक्टरपर्यंत कमी करण्यात आली आहे. तसेच या १०.५ लाख हेक्टरवर ऊसाची लागवड करण्यात आली आहे. त्यांच्या किमती ‘एमएसपी’च्या खाली आहेत. पावसाळ्यातील भरघोस उत्पादनामुळे कृषी क्षेत्रात कमी संकट दिसू शकते; परंतु पिकांच्या कमी किमती आणि लागवडीचा वाढता खर्च हे अजूनही निवडणुकीतील चर्चेचे मुद्दे असू शकतात. तसेच, लाडकी बहीण आणि ग्रामीण भूमिहीन मजुरांना लक्ष्य करणाऱ्या इतर योजनांविषयी शेतकर्‍यांमध्ये काही प्रश्न असतील, तर ते कितपत दूर होतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farm distress may be less of a poll issue in maharashtra rac