भारताचा GDP चालू आर्थिक वर्षात (२०२३-२४) ७.३ टक्क्यांनी वाढेल. तसेच गेल्या आर्थिक वर्षा २०२२-२३ मधील ७.२ टक्के वाढीपेक्षा किंचित वेग पकडेल, असे मोदी सरकारने शुक्रवारी जाहीर केलेल्या पहिल्या आगाऊ अंदाजात (FAEs) सांगितले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आर्थिक वर्ष संपायला अजून तीन महिने बाकी असताना जीडीपीचा अंदाज आताच कसा लावता येणार?

पहिले आगाऊ अंदाज दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी सादर केले जातात. त्या आर्थिक वर्षातील वाढीचे ते फक्त पहिले अंदाज आहेत. फेब्रुवारीच्या अखेरीस सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय (MoSPI) दुसरे आगाऊ अंदाज आणि मे अखेरीस तात्पुरते अंदाज जारी करते.

अधिकाधिक आणि चांगला डेटा उपलब्ध झाल्यामुळेच GDPतील अंदाज सुधारित केले जात आहेत. येत्या तीन वर्षांत सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय हे GDP चा पहिला, दुसरा आणि तिसरा सुधारित अंदाज अंतिम क्रमांकावर स्थिरावण्यापूर्वीच जारी करणार आहे, ज्याला वास्तविक अंदाज म्हटले जाते. पहिल्या आगाऊ अंदाजात सात विषम महिन्यांतील अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे मूल्यमापन असते आणि वार्षिक आधाराच्या निष्कर्षाप्रत येण्यासाठी डेटा बाहेर काढला जातो.

हेही वाचाः विश्लेषणः बांगलादेशमधील निवडणुकांचा इतिहास माहीत आहे का?

“राष्ट्रीय उत्पन्नाचे आगाऊ अंदाज निर्देशक हे बेंचमार्क-इंडिकेटर पद्धतीचा वापर करून संकलित केले जातात. म्हणजे मागील वर्षासाठी (२०२२-२३) उपलब्ध अंदाजित क्षेत्रांची कामगिरी प्रतिबिंबित करणार्‍या संबंधित निर्देशकांचा वापर करून माहिती दिली जाते,” असे अधिकृत प्रेस प्रकाशनने सांगितले आहे.

डेटा अंतिम नसल्यास आगाऊ अंदाजाचा काय फायदा?

आगाऊ अंदाजाचे महत्त्व म्हणजे येत्या आर्थिक वर्षासाठी (जे १ फेब्रुवारी रोजी सादर केले जाते) अंतिम होण्याआधी जाहीर केलेला शेवटचा GDP डेटा आहे. पहिले आगाऊ अंदाज हे बजेटसाठी आधार बनते. मात्र, एप्रिल-मेमध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार असल्याने यंदाचा पूर्ण वाढ झालेला केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या १० वर्षांतील आर्थिक विकासाचे पहिले संपूर्ण चित्र ते सादर करतील, या वस्तुस्थितीवरून या वर्षीच्या पहिल्या आगाऊ अंदाजाचे आकडे मांडले जात आहेत.

हेही वाचाः विश्लेषण: २०२४ मधील बाजाराची स्थिती; गुंतवणूकदारांसाठी आणखी एक चांगले वर्ष?

तर पहिल्या आगाऊ अंदाजाचा डेटा काय दाखवतो?

तक्ता भारताचा वास्तविक जीडीपी (महागाईचा प्रभाव काढून टाकल्यानंतर जीडीपी) दर्शवितो. तसेच संपूर्ण अटी अन् शर्थींसह (लाख कोटी रुपयांमध्ये) विकास दराच्या दृष्टीने आकडे दिलेले आहेत. मार्च २०२४ अखेर भारताचा जीडीपी जवळपास १७२ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. जेव्हा पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदा पदभार स्वीकारला, तेव्हा भारताचा जीडीपी ९८ लाख कोटी रुपये होता आणि त्यांनी त्यांचा दुसरा टर्म सुरू केला, तेव्हा तो जवळपास १४० लाख कोटी रुपयांवर पोहोचला होता.

वार्षिक आधारावर २०२३-२४ साठी अंदाजे ७.३ टक्के वाढीचा दर लक्षणीय आणि आश्चर्यकारक आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासह बहुतेक निरीक्षकांनी चालू आर्थिक वर्षात ५.५ टक्के आणि ६.५ टक्क्यांच्या दरम्यान वाढ कमी होण्याची अपेक्षा केली होती. जीडीपी वाढीचा दर आता जवळपास टक्केवारीच्या उच्च अंदाजाला मागे टाकेल, अशी अपेक्षा आहे. खरं तर हे भारताच्या आर्थिक पुनरुत्थानाची ताकद अधोरेखित करते. मात्र, पहिल्या कार्यकाळाच्या तुलनेत मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात विकासदरात घसरण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. २०१४-१५ ते २०१८-१९ दरम्यान भारतीय अर्थव्यवस्थेचा चक्रवाढ वार्षिक विकास दर (CAGR) ७.४ टक्के झाला; दुसऱ्या कार्यकाळात (२०१९-२० ते २०२३-२४) तो फक्त ४.१ टक्के होता.

याचे मोठे कारण म्हणजे सरकारच्या विद्यमान कार्यकाळातील पहिल्या दोन वर्षांतील खराब विकास दर आहे. २०१९-२० मध्ये (कोविड १९ साथीच्या आजारापूर्वी) अर्थव्यवस्था ४ टक्क्यांपेक्षा कमी वाढली आणि नंतर २०२०-२१ मध्ये (कोविड आघातानंतर लगेच) ५.६ टक्क्यांनी आकुंचन पावली. एकूणच चालू वर्षातील ७.३ टक्के वाढीचा दर हे एक आशादायी चित्र आहे, कारण यानंतर कमी पायाभूत सेवा असतानाही आर्थिक वर्ष २२ आणि आर्थिक वर्ष २३ मध्ये GDP वाढीचा दर वधारला.

भारताच्या विकासात काय योगदान?

  • भारताच्या जीडीपीची गणना अर्थव्यवस्थेतील सर्व प्रकारच्या खर्चांची संबंधित आहे. त्यात अर्थव्यवस्थेच्या मागणीची बाजूसुद्धा जोडली जाते. त्यामुळेच GDP वाढीसाठीसुद्धा चार मुख्य “इंजिन” आहेत.
  • लोकांकडून त्यांच्या वैयक्तिक क्षमतेनुसार खर्च करणे: तांत्रिकदृष्ट्या याला खासगी भांडवल निर्मितीचा दर (PFCE) म्हणतात. भारताच्या जीडीपीमध्ये त्याचा वाटा जवळपास ६० टक्के आहे.
  • अर्थव्यवस्थेच्या उत्पादक क्षमतेला चालना देण्यासाठी गुंतवणुकीसाठी खर्च करणे: हे एखाद्या कारखान्याची इमारत असू शकते, कंपन्या त्यांच्या कार्यालयांसाठी संगणक खरेदी करतात किंवा सरकारे रस्ते बांधतात. याला शासकीय भांडवल निर्मितीचा दर (GFCF) म्हणतात आणि हे वाढीचे दुसरे सर्वात मोठे इंजिन आहे, जे सामान्यत: GDP च्या ३० टक्के आहे.
  • पगारासारख्या दैनंदिन खर्चाची पूर्तता करण्यासाठी सरकारद्वारे केलेला खर्च: हा सरकारचा शासकीय भांडवल निर्मितीचा दर (GFCE) आहे. हे सर्वात लहान इंजिन आहे, ज्याचा वाटा GDP च्या सुमारे १० टक्के आहे.
  • निव्वळ निर्यात किंवा निव्वळ खर्च भारतीय आयातीवर खर्च करतात आणि परदेशी लोक भारतीय निर्यातीवर खर्च करतात: भारत सामान्यत: निर्यातीपेक्षा जास्त आयात करत असल्याने हे इंजिन GDP गणना कमी करते आणि वजा चिन्हासह दर्शवते.
  • सारणीद्वारे यातील प्रत्येक घटकाने परिपूर्ण आणि टक्केवारीने कसे योगदान दिलेय ते दाखवले आहे.
  • भांडवल निर्मितीच्या दराची मागणी: चालू वर्षात लोकांच्या एकूण मागणीत ४.४ टक्के वाढ अपेक्षित आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील CAGR (४.५ टक्के) च्या तुलनेत पण पहिल्या टर्ममधील (७.१ टक्के) वाढीच्या दरापेक्षा लक्षणीयरीत्या कमी आहे.
  • वाढत्या असमानतेमुळे खासगी भांडवल निर्मितीचा दर आणखी वाईट परिस्थितीत आहे. अर्थव्यवस्थेच्या काही भागांमध्ये (म्हणजे, शहरी श्रीमंत) त्याचा वापर बर्‍यापैकी वेगाने वाढला आहे, तर अर्थव्यवस्थेचा मोठा भाग (विशेषत: ग्रामीण भारत) अद्याप पुरेसा सावरलेला नाही. लोकांनी त्यांच्या उत्पन्नापेक्षा जास्त वापर करू नये, परंतु विकासाच्या मार्गात सर्वात मोठ्या इंजिनची निराशाजनक कामगिरी ही चिंतेची बाब आहे.
  • गुंतवणुकीचा खर्च: गुंतवणूक खर्चाचा उच्च दर हा अर्थव्यवस्थेच्या संभाव्यतेसाठी एक फायदेशीर सिग्नल मानला जातो, कारण तो भविष्यातील व्यवसायातील भांडवली निर्मितीच्या मागणीबद्दल आशावादी असतो. याच्या पार्श्वभूमीवर चालू आर्थिक वर्षात गुंतवणुकीत ९.३ टक्के वाढ झाली आहे, त्यामुळे दुसऱ्या टर्ममध्ये (५.६ टक्के) CAGR ला पहिल्या (७.३ टक्के) जवळ ठेवण्यास मदत झाली आहे.
  • दोन प्रलंबित मुद्दे आहेत: एक, गुंतवणूक खर्चाचा एक मोठा भाग अजूनही सरकारकडून येत आहे आणि दोन खासगी वापर अजूनही निराशाजनक आहे.
  • सरकारी खर्च: चालू वर्षात खासगी मागणीतील वाढ ३.९ टक्के इतकी कमजोर आहे, सरकारी खर्च आणखी कमी झाला आहे. कोविड व्यत्यय असूनही सरकारी खर्च दुसऱ्या टर्ममध्ये केवळ वाढला आहे. २.८ टक्क्यांच्या CAGR वर ते पहिल्या टर्मच्या ७.९ टक्क्यांच्या CAGR पेक्षा खूपच कमी आहे.
  • निव्वळ निर्यात: जेव्हा कोणत्याही विशिष्ट वर्षाचा डेटा नकारात्मक चिन्हासह पाहायला मिळतो, तेव्हा भारतीय निर्यातीपेक्षा जास्त आयात करीत असल्याचे दिसते. मोदी सरकारच्या दोन टर्ममध्ये विकास दर १९.६ टक्क्यांवरून १३.३ टक्क्यांपर्यंत घसरला आहे, ही एक सौम्य सुधारणा असल्याचं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

आर्थिक वर्ष संपायला अजून तीन महिने बाकी असताना जीडीपीचा अंदाज आताच कसा लावता येणार?

पहिले आगाऊ अंदाज दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी सादर केले जातात. त्या आर्थिक वर्षातील वाढीचे ते फक्त पहिले अंदाज आहेत. फेब्रुवारीच्या अखेरीस सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय (MoSPI) दुसरे आगाऊ अंदाज आणि मे अखेरीस तात्पुरते अंदाज जारी करते.

अधिकाधिक आणि चांगला डेटा उपलब्ध झाल्यामुळेच GDPतील अंदाज सुधारित केले जात आहेत. येत्या तीन वर्षांत सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय हे GDP चा पहिला, दुसरा आणि तिसरा सुधारित अंदाज अंतिम क्रमांकावर स्थिरावण्यापूर्वीच जारी करणार आहे, ज्याला वास्तविक अंदाज म्हटले जाते. पहिल्या आगाऊ अंदाजात सात विषम महिन्यांतील अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे मूल्यमापन असते आणि वार्षिक आधाराच्या निष्कर्षाप्रत येण्यासाठी डेटा बाहेर काढला जातो.

हेही वाचाः विश्लेषणः बांगलादेशमधील निवडणुकांचा इतिहास माहीत आहे का?

“राष्ट्रीय उत्पन्नाचे आगाऊ अंदाज निर्देशक हे बेंचमार्क-इंडिकेटर पद्धतीचा वापर करून संकलित केले जातात. म्हणजे मागील वर्षासाठी (२०२२-२३) उपलब्ध अंदाजित क्षेत्रांची कामगिरी प्रतिबिंबित करणार्‍या संबंधित निर्देशकांचा वापर करून माहिती दिली जाते,” असे अधिकृत प्रेस प्रकाशनने सांगितले आहे.

डेटा अंतिम नसल्यास आगाऊ अंदाजाचा काय फायदा?

आगाऊ अंदाजाचे महत्त्व म्हणजे येत्या आर्थिक वर्षासाठी (जे १ फेब्रुवारी रोजी सादर केले जाते) अंतिम होण्याआधी जाहीर केलेला शेवटचा GDP डेटा आहे. पहिले आगाऊ अंदाज हे बजेटसाठी आधार बनते. मात्र, एप्रिल-मेमध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार असल्याने यंदाचा पूर्ण वाढ झालेला केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या १० वर्षांतील आर्थिक विकासाचे पहिले संपूर्ण चित्र ते सादर करतील, या वस्तुस्थितीवरून या वर्षीच्या पहिल्या आगाऊ अंदाजाचे आकडे मांडले जात आहेत.

हेही वाचाः विश्लेषण: २०२४ मधील बाजाराची स्थिती; गुंतवणूकदारांसाठी आणखी एक चांगले वर्ष?

तर पहिल्या आगाऊ अंदाजाचा डेटा काय दाखवतो?

तक्ता भारताचा वास्तविक जीडीपी (महागाईचा प्रभाव काढून टाकल्यानंतर जीडीपी) दर्शवितो. तसेच संपूर्ण अटी अन् शर्थींसह (लाख कोटी रुपयांमध्ये) विकास दराच्या दृष्टीने आकडे दिलेले आहेत. मार्च २०२४ अखेर भारताचा जीडीपी जवळपास १७२ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. जेव्हा पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदा पदभार स्वीकारला, तेव्हा भारताचा जीडीपी ९८ लाख कोटी रुपये होता आणि त्यांनी त्यांचा दुसरा टर्म सुरू केला, तेव्हा तो जवळपास १४० लाख कोटी रुपयांवर पोहोचला होता.

वार्षिक आधारावर २०२३-२४ साठी अंदाजे ७.३ टक्के वाढीचा दर लक्षणीय आणि आश्चर्यकारक आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासह बहुतेक निरीक्षकांनी चालू आर्थिक वर्षात ५.५ टक्के आणि ६.५ टक्क्यांच्या दरम्यान वाढ कमी होण्याची अपेक्षा केली होती. जीडीपी वाढीचा दर आता जवळपास टक्केवारीच्या उच्च अंदाजाला मागे टाकेल, अशी अपेक्षा आहे. खरं तर हे भारताच्या आर्थिक पुनरुत्थानाची ताकद अधोरेखित करते. मात्र, पहिल्या कार्यकाळाच्या तुलनेत मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात विकासदरात घसरण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. २०१४-१५ ते २०१८-१९ दरम्यान भारतीय अर्थव्यवस्थेचा चक्रवाढ वार्षिक विकास दर (CAGR) ७.४ टक्के झाला; दुसऱ्या कार्यकाळात (२०१९-२० ते २०२३-२४) तो फक्त ४.१ टक्के होता.

याचे मोठे कारण म्हणजे सरकारच्या विद्यमान कार्यकाळातील पहिल्या दोन वर्षांतील खराब विकास दर आहे. २०१९-२० मध्ये (कोविड १९ साथीच्या आजारापूर्वी) अर्थव्यवस्था ४ टक्क्यांपेक्षा कमी वाढली आणि नंतर २०२०-२१ मध्ये (कोविड आघातानंतर लगेच) ५.६ टक्क्यांनी आकुंचन पावली. एकूणच चालू वर्षातील ७.३ टक्के वाढीचा दर हे एक आशादायी चित्र आहे, कारण यानंतर कमी पायाभूत सेवा असतानाही आर्थिक वर्ष २२ आणि आर्थिक वर्ष २३ मध्ये GDP वाढीचा दर वधारला.

भारताच्या विकासात काय योगदान?

  • भारताच्या जीडीपीची गणना अर्थव्यवस्थेतील सर्व प्रकारच्या खर्चांची संबंधित आहे. त्यात अर्थव्यवस्थेच्या मागणीची बाजूसुद्धा जोडली जाते. त्यामुळेच GDP वाढीसाठीसुद्धा चार मुख्य “इंजिन” आहेत.
  • लोकांकडून त्यांच्या वैयक्तिक क्षमतेनुसार खर्च करणे: तांत्रिकदृष्ट्या याला खासगी भांडवल निर्मितीचा दर (PFCE) म्हणतात. भारताच्या जीडीपीमध्ये त्याचा वाटा जवळपास ६० टक्के आहे.
  • अर्थव्यवस्थेच्या उत्पादक क्षमतेला चालना देण्यासाठी गुंतवणुकीसाठी खर्च करणे: हे एखाद्या कारखान्याची इमारत असू शकते, कंपन्या त्यांच्या कार्यालयांसाठी संगणक खरेदी करतात किंवा सरकारे रस्ते बांधतात. याला शासकीय भांडवल निर्मितीचा दर (GFCF) म्हणतात आणि हे वाढीचे दुसरे सर्वात मोठे इंजिन आहे, जे सामान्यत: GDP च्या ३० टक्के आहे.
  • पगारासारख्या दैनंदिन खर्चाची पूर्तता करण्यासाठी सरकारद्वारे केलेला खर्च: हा सरकारचा शासकीय भांडवल निर्मितीचा दर (GFCE) आहे. हे सर्वात लहान इंजिन आहे, ज्याचा वाटा GDP च्या सुमारे १० टक्के आहे.
  • निव्वळ निर्यात किंवा निव्वळ खर्च भारतीय आयातीवर खर्च करतात आणि परदेशी लोक भारतीय निर्यातीवर खर्च करतात: भारत सामान्यत: निर्यातीपेक्षा जास्त आयात करत असल्याने हे इंजिन GDP गणना कमी करते आणि वजा चिन्हासह दर्शवते.
  • सारणीद्वारे यातील प्रत्येक घटकाने परिपूर्ण आणि टक्केवारीने कसे योगदान दिलेय ते दाखवले आहे.
  • भांडवल निर्मितीच्या दराची मागणी: चालू वर्षात लोकांच्या एकूण मागणीत ४.४ टक्के वाढ अपेक्षित आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील CAGR (४.५ टक्के) च्या तुलनेत पण पहिल्या टर्ममधील (७.१ टक्के) वाढीच्या दरापेक्षा लक्षणीयरीत्या कमी आहे.
  • वाढत्या असमानतेमुळे खासगी भांडवल निर्मितीचा दर आणखी वाईट परिस्थितीत आहे. अर्थव्यवस्थेच्या काही भागांमध्ये (म्हणजे, शहरी श्रीमंत) त्याचा वापर बर्‍यापैकी वेगाने वाढला आहे, तर अर्थव्यवस्थेचा मोठा भाग (विशेषत: ग्रामीण भारत) अद्याप पुरेसा सावरलेला नाही. लोकांनी त्यांच्या उत्पन्नापेक्षा जास्त वापर करू नये, परंतु विकासाच्या मार्गात सर्वात मोठ्या इंजिनची निराशाजनक कामगिरी ही चिंतेची बाब आहे.
  • गुंतवणुकीचा खर्च: गुंतवणूक खर्चाचा उच्च दर हा अर्थव्यवस्थेच्या संभाव्यतेसाठी एक फायदेशीर सिग्नल मानला जातो, कारण तो भविष्यातील व्यवसायातील भांडवली निर्मितीच्या मागणीबद्दल आशावादी असतो. याच्या पार्श्वभूमीवर चालू आर्थिक वर्षात गुंतवणुकीत ९.३ टक्के वाढ झाली आहे, त्यामुळे दुसऱ्या टर्ममध्ये (५.६ टक्के) CAGR ला पहिल्या (७.३ टक्के) जवळ ठेवण्यास मदत झाली आहे.
  • दोन प्रलंबित मुद्दे आहेत: एक, गुंतवणूक खर्चाचा एक मोठा भाग अजूनही सरकारकडून येत आहे आणि दोन खासगी वापर अजूनही निराशाजनक आहे.
  • सरकारी खर्च: चालू वर्षात खासगी मागणीतील वाढ ३.९ टक्के इतकी कमजोर आहे, सरकारी खर्च आणखी कमी झाला आहे. कोविड व्यत्यय असूनही सरकारी खर्च दुसऱ्या टर्ममध्ये केवळ वाढला आहे. २.८ टक्क्यांच्या CAGR वर ते पहिल्या टर्मच्या ७.९ टक्क्यांच्या CAGR पेक्षा खूपच कमी आहे.
  • निव्वळ निर्यात: जेव्हा कोणत्याही विशिष्ट वर्षाचा डेटा नकारात्मक चिन्हासह पाहायला मिळतो, तेव्हा भारतीय निर्यातीपेक्षा जास्त आयात करीत असल्याचे दिसते. मोदी सरकारच्या दोन टर्ममध्ये विकास दर १९.६ टक्क्यांवरून १३.३ टक्क्यांपर्यंत घसरला आहे, ही एक सौम्य सुधारणा असल्याचं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.