Gaganyaan 2025: गगनयान ही भारताची मानवी सहभाग असलेली पहिलीच अंतराळ मोहीम आहे. ही मोहीम भारतीय अंतराळ संशोधन संस्थेद्वारे- इस्रोद्वारे (ISRO) राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत भारतीय अंतराळवीरांना (Gagannauts) स्वदेशी अंतराळयानाद्वारे पृथ्वीच्या कक्षेत पाठवण्यात येणार आहे. अशा प्रकारची पहिली अंतराळ मोहीम असल्याने भारतासाठी ती अतिशय महत्त्वाची आहे. भारतीय अंतराळवीर पृथ्वीच्या ४०० किमी कक्षेत तीन दिवस राहणार आहेत. या मोहिमेसाठी स्वदेशी बनावटीचे ‘गगनयान’ (अंतराळयान) वापरण्यात येणार आहे. रशिया, अमेरिका आणि चीननंतर भारत हा मानवी सहभाग असलेला अवकाश प्रवास करणारा चौथा देश ठरणार आहे. अंतराळात मानवी अस्तित्व टिकवण्याची क्षमता विकसित करणे, भविष्यातील मोठ्या मानवयुक्त अंतराळ मोहिमांसाठी तंत्रज्ञान विकसित करणे, अंतराळ विज्ञान आणि जैववैज्ञानिक प्रयोगांसाठी नवीन संधी निर्माण करणे इत्यादी या मोहिमेची प्रमुख उद्दिष्ट आहेत. गगनयान मोहिमेच्या यशानंतर चंद्रयान-४, आदित्य एल-२ आणि भविष्यातील मानवी चंद्र व मंगळ मोहिमा शक्य होतील असे मत तज्ज्ञ व्यक्त करतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा