केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात बिहारसह देशभरात अनेक दिवसांपासून उग्र निदर्शने सुरू होती. या दरम्यान कोट्यवधी रुपयांच्या सरकारी मालमत्तेचे नुकसान झाले. प्राथमिक तपासात बिहारमधील हिंसाचारामागे काही कोचिंग सेंटर्सचा संबंध असल्याचा दावा केला जात आहे. अशा परिस्थितीत पोलिसांनी या कोचिंग संस्थांवर कारवाई सुरू केली आहे. यातील एक नाव गुरु रहमानचे समोर येत आहे. चला जाणून घेऊया कोण आहेत गुरु रहमान

भडकाऊ भाषण

Vadhavan port to Igatpuri expressway,
वाढवण-इगतपुरी प्रवास केवळ एका तासात; महामार्गासाठी १८ हजार कोटींचा खर्च; प्रकल्प अंमलबजावणीच्या व्यवहार्यता अभ्यासाला वेग
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
mumbai metropolitan region development planning by mmrda
एमएमआर ग्रोथ हबसाठी अंमलबजावणी कक्षनियोजन विभागाकडून स्थापना, आर्थिक विकास वाढीसाठी अनेक प्रकल्प
Infosys terminates over 400 trainees in Mysuru
इन्फोसिसचे ‘लेऑफ’बद्दल म्हणणे काय…?
Superstition Eradication Committee to launch courses for public education against superstition
अंधश्रद्धाविरोधी लोकशिक्षणासाठी अंनिस अभ्यासक्रम सुरू करणार
Demolition drive against illegal chawls in Titwala-Manda
टिटवाळा-मांडामध्ये बेकायदा चाळींच्या विरुध्द तोडकामाची मोहीम
Congress forms panel to monitor ‘conduct of free and fair elections
निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी काँग्रेसची समिती; मतदारयाद्यांमधील घोळाचा आढावा घेण्याचा निर्णय
response , students , Atal, initiative , CET cell ,
सीईटी कक्षाच्या ‘अटल’ उपक्रमाला विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद

पाटणाचे उपनिरिक्षक मानवजीत सिंह ढिल्लन यांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ जून रोजी गुरु रहमान यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. अग्निपथ योजनेबाबत गुरु रेहमान आपल्या शब्दांतून विद्यार्थ्यांना भडकावत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना रेल्वे रोखून तीव्र आंदोलन करण्यास प्रवृत्त केले आहे. एका यूट्यूब चॅनलशी झालेल्या संभाषणात ते म्हणाले होते, ‘तुम्ही ट्रेन थांबवू शकता, कारण ते तुमचे भविष्य रोखत आहेत. यावेळची क्रांती संपूर्ण क्रांतीपेक्षा मोठी असेल. असा सल्लाही गुरु रहमान यांनी विद्यार्थ्यांना दिला होता.

यूपीएससीमध्ये ४० मुलांची निवड झाली आहे

गुरु रहमान पाटणा येथील गोपाल मार्केटमध्ये कोचिंग सेंटर चालवतात. रहमान यांनी दोनदा आयएएसची मुलाखत दिली आहे. १९९६ मध्ये त्यांनी पहिल्यांदा UPSC ची मुलाखत दिली. पण दोन्ही वेळा यश न मिळाल्याने त्यांनी रहमान एम (एआयएम) नावाचे कोचिंग सेंटर उघडले. तेव्हा त्याच्या वर्गात फक्त १०-१२ मुले होती. १९९८ मध्ये त्यांच्या एका विद्यार्थ्याची यूपीएससीमध्ये निवड झाली. यानंतर बातमी पसरली की एक सर कोणतीही फी न घेता UPSC ची तयारी करुन घेतात. त्यानंतर ठिकठिकाणचे विद्यार्थी त्यांच्याकडे येऊ लागले. रहमानच्या २२ वर्षांच्या कोचिंगमध्ये ४० मुलांची यूपीएससीमध्ये निवड झाली आहे.

११-१०० रुपयांत कोचिंग दिले जाते
बिहार व्यतिरिक्त उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि झारखंडमधील विद्यार्थी गुरू रहमान यांच्याकडून कोचिंग घेण्यासाठी येतात. काही आर्थिक दुर्बल मुले ११ ते १०० रुपये फी भरुन रहमानला कोचिंग देतात, असे सांगितले जाते. यशस्वी पदांवर पोहोचल्यानंतर, हे विद्यार्थी अकादमी आणि रहमान यांच्याकडून होत असलेल्या सामाजिक सुधारणांच्या कार्यासाठी देणगी देतात.

जन्म कुठे झाला?
गुरु रहमान यांचा जन्म १० जानेवारी १९७४ रोजी सारण जिल्ह्यातील बसंतपूर येथे झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण देहरी ऑन सोन येथून झाले. त्यानंतर बनारस हिंदू विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतले. येथून त्यांनी प्राचीन भारत आणि पुरातत्वशास्त्रात बॅचलर आणि मास्टर्स केले. त्यानंतर कोचिंग सेंटरमध्ये शिकवायला सुरुवात केली. पुढे त्यांनी पाटणा विद्यापीठात अध्यापन सुरू केले आणि येथे त्यांना सर्वोत्कृष्ट शिक्षकाचा पुरस्कार मिळाला. १९९७ मध्ये रहमान यांनी ऋग्वेद काळातील आर्थिक आणि सामाजिक विश्लेषण या विषयावर पीएचडी पूर्ण केली.

Story img Loader