समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी ‘हिंदू मंदिरे आज ज्या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी पूर्वी बौद्ध वास्तू होत्या, त्या नष्ट करून हिंदू मंदिरे बांधली गेली आहेत का, हे शोधण्याकरिता पुरातत्त्व सर्वेक्षण करण्याची मागणी केली आहे. सध्या एका बाजूस वाराणसीतील ज्ञानवापी मशीद परिसरासंदर्भात सध्या खटला सुरू आहे, तर दुसरीकडे मौर्य यांनी गेल्या आठवड्यात एका सार्वजनिक कार्यक्रमातील भाषणात हे वक्तव्य केले. “(तुम्हाला) आजच्या मशिदींपूर्वी कोणत्या वास्तू अस्तित्वात होत्या याचे सर्वेक्षण करायचे असल्यास, त्या वास्तूंपूर्वी काय अस्तित्वात होते हेदेखील शोधण्याकरिता सर्वेक्षण केले पाहिजे. बौद्ध धार्मिक स्थळे नष्ट करून त्या जागी अनेक हिंदू मंदिरे बांधण्यात आली,” असे विधान त्यांनी केले. त्यामुळे नव्या वादाला सुरुवात झाल्याची चर्चा आहे. त्याच निमित्ताने प्राचीन भारतीय संदर्भ नेमके काय सांगतात हे समजून घेणे महत्त्वाचे ठरणारे आहे. स्वामी प्रसाद मौर्य यांनी त्यांच्या विधानाच्या स्पष्टीकरणार्थ बद्रिनाथ, केदारनाथ मंदिराचा उल्लेख केला. उत्तराखंडमधील हे मंदिर ८ व्या शतकात बौद्ध मठाच्या जागेवर बांधले गेले, असा त्यांचा दावा आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा