God Hanuman Marriage Story : भारताला लाखो वर्षांचा इतिहास आहे. भारताचा इतर देशांशी व्यापाराच्या निमित्ताने आलेला संबंध आदिम काळापासून आहे. या व्यापारी संबंधातून अनेक वेळा सांस्कृतिक देवाणघेवाण झाली होती. म्हणूनच अनेक आशियाई देशांमध्ये रामायण, महाभारतासारख्या भारतीय महाकाव्यांचा लीलया झालेला स्वीकार हा अद्भुत मानला जातो. या देशांनी भारतीय महाकाव्यांचा स्वीकार केला, तरी या कथा-काव्य पूर्णतः आहेत तशा स्वरूपात स्वीकारल्या नाहीत. आपल्या स्थानिक परंपरांचा समावेश या देशांनी भारतीय महाकाव्यांमध्ये करून त्यांना आपलेसे केले. यामध्ये आग्नेय आशियाई देश अग्रेसर होते. केवळ कथा-काव्यच नाही तर त्या निमित्ताने त्यांचा आलेला भारतीय देवतासमूहाशी संबंध व या संबंधातून नव्याने जन्मास आलेला सांस्कृतिक अनुबंध हा अधोरेखित करण्यासारखा आहे. म्हणूनच हनुमान जयंतीच्या निमित्ताने कंबोडिया येथील हनुमानकथेविषयी या लेखात जाणून घेणार आहोत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा