उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यातील एका सत्संग कार्यक्रमादरम्यान मंगळवारी (२ जुलै) झालेल्या चेंगराचेंगरीत किमान ११६ जणांचा मृत्यू झाला आणि शेकडो भाविक जखमी झाले आहेत. या मृतांमध्ये महिला आणि मुलांचे प्रमाण सर्वाधिक असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून, आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अशा प्रकारच्या धार्मिक आयोजनामध्ये चेंगराचेंगरी होऊन मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना नाही. एफ. टी. इलियास आणि इतरांनी जमविलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, १९५४ ते २०१२ या काळात भारतात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनांमधील ७९ टक्के घटना या धार्मिक कार्यक्रमांमध्येच घडल्या आहेत. (ह्युमन स्टॅम्पेड्स ड्युरिंग रिलिजियस फेस्टिव्हल्स : अ कम्पॅरेटिव्ह रिव्ह्यू ऑफ मास गॅदरिंग इमर्जन्सीज इन इंडिया, २०१३) चेंगराचेंगरीच्या घटना कशा घडतात आणि त्यामागे कोणती कारणे असतात, ते पाहू.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा