गेल्या G20 शिखर परिषदेदरम्यान जागतिक नेत्यांसाठी भारताच्या राष्ट्रपतींनी आयोजित केलेल्या सहभोजनाचे (स्टेट डिनरचे) परंपरागत निमंत्रण ‘इंडियाचे राष्ट्रपती’ या ऐवजी ‘भारताचे राष्ट्रपती’ या शीर्षकाने पाठवण्यात आल्याने राजकीय वादाला तोंड फुटले होते. विरोधकांच्या एकत्रित युतीला ‘इंडिया’ असे नाव दिल्याने भाजपाकडून’ भारत’ या नावाला मुद्दाम प्राधान्य दिले जात आहे, असा आरोप विरोधकांनी केला होता. तर सत्ताधारी पक्षाने ‘काँग्रेसला भारत या नावाबद्दल काय अडचण आहे?’ असा सवाल केला. घटनेत इंडिया आणि भारत या दोन्हींचा उल्लेख आहे, संविधानाच्या अनुच्छेद १ मध्ये म्हटल्याप्रमाणे “इंडिया, म्हणजे भारत, हा राज्यांचा संघ असेल.” याशिवाय भारताची वेगवेगळी नावे आहेत. ज्यात हिंदुस्थान, प्राचीन भारतवर्ष, आर्यावर्त इत्यादी नावांचा समावेश होतो.
इंडिया आणि भारत यासंदर्भातील वाद हा द्रमुक (DMK) नेते उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्मावरील वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर समोर आला होता. हिंदुत्त्ववादी विचारवंत विनायक दामोदर सावरकर यांनी आपल्या ग्रंथांमध्ये हे सर्व विषय सविस्तर हाताळले आहेत. हिंदुस्थान आणि भारत ही नावे आणि सनातन धर्म, हिंदू धर्म आणि हिंदुत्व यातील फरक यांविषयी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी काय नमूद केले आहे, ते जाणून घेऊ.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा