नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर “जामतारा… सबका नंबर आयेगा” ही वेब सीरिज अनेकांनी पाहिली असेल. दोन सीझन असलेल्या या सीरिजने भारतीयांच्या सायबर क्राइमच्या ज्ञानात चांगलीच भर टाकली आहे. झारखंडमध्ये जामतारा नावाचा जिल्हा आहे. या जिल्ह्यातील एका गावातील मुले अचानक श्रीमंत होतात. तपासाअंती कळते की, या गावातील मुले डेबिट कार्डद्वारे फिशिंग करून, लोकांच्या बँक खात्यातील पैसे हडप करीत असतात. अर्थातच सायबर क्राइमच्या अगदी सुरुवातीच्या काळातील घोटाळे (सायबर स्कॅम) यात दाखवले गेले आहेत. या सीरिजमध्ये सनी नावाचे एक कमी शिकलेले पात्र आहे. सनी कमी शिकलेला असला तरी तो सायबर क्राइमच्या नवनव्या क्लृप्त्या शोधून काढत असतो. सर्वांनाच सायबर क्राइम काय आहे? त्यापासून कसे सांभाळून राहायचे? याची माहिती असते. पण समस्या अशी आहे की, स्कॅमर्स जुन्या कल्पना वगळून नवनव्या युक्त्यांद्वारे फसवणूक करीतच राहतात. सध्या भारतात असाच एक मोठा सायबर घोटाळा झाला आहे; ज्यात १५ हजार भारतीयांना ७०० कोटींहून अधिकचा गंडा घालण्यात आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा