भारतात १४ सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. भारताच्या संविधान सभेने हिंदी भाषेला केंद्र सरकारची राजभाषा म्हणून दर्जा दिल्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. १४ सप्टेंबर २०२३ रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “भारतात अनेक भिन्न भाषा आहेत. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशांतील या वैविध्यपूर्ण भाषांना एकत्रित आणण्याचे काम हिंदी भाषेद्वारे केले जाते.” अमित शाह यांच्या ट्विटला प्रत्युत्तर देताना तमिळनाडूचे क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन म्हणाले की, फक्त चार ते पाच राज्यांमध्ये बोलली जाणारी भाषा राष्ट्राला एकत्र करते, असा दावा करणे हास्यास्पद आहे. तमिळनाडूची भाषा तमिळ आहे आणि शेजारच्या केरळ राज्याची भाषा मल्याळम, मग या दोन राज्यांना हिंदी भाषा एकत्र कशी करू शकते? असा प्रश्न स्टॅलिन यांनी उपस्थित केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा