गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर कुशीनगरमध्ये युद्धाला सुरुवात झाली. गौतम बुद्धांच्या शरीर धातूचे रक्षण करणाऱ्या मल्लांविरोधात शेजारील राज्ये, सरदार एकत्र आले होते. बुद्ध धातूवर नक्की कोणाचा अधिकार, हा प्रश्न युद्धासाठी कारणीभूत ठरला. शेवटी द्रोण नावाच्या पुजाऱ्याने पुढाकार घेत या संघर्षावर उपाय शोधला. हा उपाय इतिहासात ‘बुद्धधातू मुत्सद्देगिरी’ म्हणून ओळखला जातो. जी आजही कायम आहे. बुद्धधातू भारत आणि जगाच्या इतर भागात नेण्यात आले, त्याचबरोबर बौद्ध धम्माचाही भारताबाहेर प्रसार झाला. १९ व्या शतकात ब्रिटिशांनी भारतात पुरातत्त्व या विषयाची पायाभरणी केली, यानंतर झालेल्या पुरातत्त्वीय सर्वेक्षणात अनेक बौद्ध स्तूप आणि स्थळांचा शोध घेतला गेला. यात सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांचे योगदान मोलाचे ठरले. बौद्ध साहित्यात नमूद केलेल्या स्तुपांचा-स्थळांचा त्यांनी प्रत्यक्ष त्या जागी भेट देऊन शोध घेतला. त्यामुळे इतिहासातील एक अज्ञात पर्व जगासमोर उलगडण्यास मदत झाली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा