गेल्या काही दिवसांपूर्वीच कोट्यवधी भारतीयांचा आधार अन् पासपोर्ट संबंधित डेटा लीक झाल्याची माहिती समोर आली होती, त्यानंतर मोठी खळबळही उडाली होती. मोदी सरकारने उपाययोजना म्हणून कंपन्यांनाही कडक सूचना दिल्या होत्या. लोकांच्या वैयक्तिक डेटाबाबत व्यवहार करणाऱ्या कंपन्यांनी डेटा सुरक्षेबाबत योग्य उपाययोजना न केल्यास त्यांना मोठा दंड ठोठावण्याची तरतूदही करण्यात आली आहे. अलिकडेच कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाला आपल्या ऑनलाइन पोर्टलमध्ये काही महिन्यांत सुरक्षेबाबतीत गंभीर त्रुटी आढळली आहे. त्यानंतर सायबर सुरक्षा संशोधकाने त्याची कल्पना कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम ऑफ इंडिया (CERT-In) ला दिली आहे. असुरक्षिततेमुळे भारतीय कंपन्यांच्या ९८ लाखांहून अधिक संचालकांचे वैयक्तिक तपशील जसे की, आधार, पॅन, मतदार ओळख, पासपोर्ट, जन्मतारीख, संपर्क क्रमांक आणि संपर्क पत्ता उघड झाले आहेत. असुरक्षिततेमुळे उद्योगपती, सेलिब्रिटींचा वैयक्तिक डेटादेखील उघड झाला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा