T20 World Cup 2024, IND vs SA Final: आठ सामने आठ विजय आणि टी२० विश्वविजेतेपदावर कब्जा. स्वप्नवत वाटावी अशी कामगिरी करत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने २००७ नंतर तब्बल १७ वर्षांनी टी२० वर्ल्डकपचा करंडक उचलला. या करंडकासह आयसीसी जेतेपदांचा दशकभराचा दुष्काळही भारतीय संघाने संपुष्टात आणला. कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनी या आयसीसी वर्ल्डकपविजेत्या कर्णधारांच्या मांदियाळीत आता रोहित शर्माचाही समावेश झाला आहे. या विजयाचं अधोरेखित होणारं वैशिष्ट्य म्हणजे एकीचं बळ. कोणी एक खेळाडू या विजयाचा नायक नाही तर असंख्य नायकांची फौज या विजयाची मानकरी आहे. बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग अशा तिन्ही आघाड्यांवर भारतीय संघाने सर्वोत्तम प्रदर्शन केलं. भारताचे माजी कर्णधार राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने मिळवलेल्या या विजयाने गेल्या वर्षी वनडे वर्ल्डकपच्या फायनल लढतीत झालेल्या पराभवाचे व्रण पुसले गेले. टीम इंडियाने कसा साध्य केला विश्वविजय, कोणत्या मुद्यांवर दिलं लक्ष जाणून घेऊया.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा