तब्बल सात टप्प्यांमध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आज (४ जून) लागणार आहे. एकीकडे आम्ही ‘४०० पार’ जाणार असल्याचा दावा भाजपाने केला आहे; तर दुसरीकडे आम्ही २९५ जागा जिंकून केंद्रात सत्ता प्राप्त करू, असा दावा इंडिया आघाडीने केला आहे. २०२४ च्या या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. केंद्रात सत्ता स्थापन करण्यासाठी उत्तर प्रदेश हे इतर सगळ्या राज्यांमध्ये महत्त्वाचे ठरते. या राज्यामध्ये लोकसभेचे तब्बल ८० मतदारसंघ आहेत. सर्वांत जास्त जागा असलेल्या या राज्यामध्ये ज्या पक्षाचा वरचष्मा असतो, त्याला केंद्रातील सत्ता प्राप्त करणे सहज शक्य होते, असा आजवरचा इतिहास सांगतो. त्यामुळेच या राज्यातून सर्वाधिक पंतप्रधान देशाला मिळाले आहेत. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशचे नसले तरीही ते २०१४ पासूनच उत्तर प्रदेशमधील वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणे पसंत करतात. यावेळीही त्यांनी याच मतदारसंघाची निवड केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा