मुंबई-अहमदाबाद तसेच मुंबई-नाशिक या दोन्ही महत्त्वाच्या महामार्गांसाठी जोडरस्ता ठरत असल्याने घोडबंदर मार्गावरील वाहतूक दिवसागणिक वाढू लागली आहे. शिवाय या मार्गाच्या दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणावर नागरी वसाहती उभ्या रहात असल्याने ठाण्यातील अंतर्गत वाहतुकीचा भारही या रस्त्यावर आहेच. वडाळा-घाटकोपर-कासारवडवली-गायमुख या मार्गावर मेट्रो मार्ग सुरू झाल्यावर घोडबंदरवर असलेला वाहनांचा भार कमी होईल असे ठामपणे कुणालाही सांगत येत नाही. या पार्श्वभूमीवर कोंडीग्रस्त घोडबंदरला पर्यायी रस्ता म्हणून खारेगाव ते गायमुख असा खाडी किनारी मार्ग उभारणीसाठी वेगाने हालचाली सुरू आहेत. या नव्या मार्गामुळे ठाणे आणि घोडबंदर भागातील महामार्गांवरील अवजड वाहनांचा भार कमी होऊ शकेल असा दावा केला जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा