गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळेच राज्यात शून्य अपघात मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेद्वारे अपघातांमुळे होणारे मृत्यू आणि जखमींची संख्या नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सर्वाधिक अपघात दुचाकीस्वारांचे होत असल्याचे निदर्शनास आले असून एकूण अपघाती मृत्यूच्या संख्येत दुचाकीस्वारांचे प्रमाण सुमारे ६० टक्के आहे. त्यामुळे दुचाकीस्वारासह त्यांच्या मागे बसणाऱ्या सहप्रवाशाला हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक, वाहतूक कार्यालयाने यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. आता वाहतूक पोलिसांनी या आदेशाची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू केली आहे. त्याचबरोबर परिवहन विभागानेही राज्यात शून्य अपघात मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत दुचाकीस्वार आणि सहप्रवाशाला हेल्मेटसक्ती केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा