भारतीय संघाने पाकिस्तानच्या संघाविरोधात चार गडी राखून विजय मिळवला. अगदीच रोमहर्षक सामन्यामधील शेवटच्या दोन षटकांमध्ये सामना फिरला आणि विजयाचं पारडं भारताच्या बाजूने झुकलं. भारताने १६० धावांचं लक्ष्य अगदी २० षटकांमध्ये शेवटच्या चेंडूवर गाठलं. रविचंद्रन अश्वीनने भारतासाठी विजयी धावा केल्या. मात्र सामन्यामध्ये विजयश्री खेचून आणण्यात विराट कोहलीने मोठा वाटा उचलला. विराट ५२ चेंडूंमध्ये ८२ धावा करत नाबाद राहिला. विराटने सहा चौकार आणि चार षटकारांच्या साहाय्याने सुंदर खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. मात्र या विजयानंतर डेड बॉलची सोशल मीडियावर चर्चा होती. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमनेही डेड बॉलच्या मागणीसाठी थेट पंचांसोबत वाद घातल्याचं दिसून आलं. ‘डेड बॉल’ हा शब्द क्रिकेट खेळणाऱ्यांनी आणि या खेळाची जाण असणाऱ्यांनी कधी ना कधी नक्कीच ऐकला असणार. गल्ली क्रिकेटमध्ये तर हा शब्द हमखास वापरला जातो. याच ‘डेड बॉल’वरुन भारत पाकिस्तान सामन्यामध्ये मोठा वाद झाला. नेमकं मैदानात घडलं काय अन् तो चेंडू डेड बॉल का घोषित करण्यात आला नाही पाहूयात…
नक्की वाचा >> Ind vs Pak: शेवटच्या दोन ओव्हर पाहण्यासाठी उड्डाण पाच मिनिटांनी लांबवलं? विमान मुंबई एअरपोर्टच्या रनवेवर धावत असतानाच…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा