ब्रिटिशांच्या तब्बल दीडशे वर्षांच्या जुलमी राजवटीतून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. या घटनेला आता ७७ वर्षे पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्याबरोबरच या भूभागाला एकसंध देशाचे स्वरूप प्राप्त झाले. ब्रिटिशांच्या राजवटीपूर्वी हा देश छोट्या-मोठ्या राजांच्या राज्यांमध्ये विभागला गेला होता. मात्र, भारतीय म्हणून राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण झाली ती स्वातंत्र्याच्या चळवळीमुळेच! मात्र, स्वतंत्र भारताच्या निर्मितीला पाकिस्तानच्या निर्मितीमुळे गालबोट लागले. धर्मांधतेमुळे मने कलुषित झाली, ती विभागली गेली आणि एकसंध भूमी विभागली गेली. राष्ट्रीय चळवळीतल्या नेत्यांना हे अपेक्षित नसले तरीही त्यांच्यासमोर पर्याय उरला नव्हता. मात्र, भारत आणि पाकिस्तान अशा दोन देशांची निर्मिती करणे हे तितके सोपे काम नव्हते. हे कठीण काम पार पाडण्याची जबाबदारी ब्रिटिशांनी सर सिरिल रॅडक्लिफ या ब्रिटीश वकिलावर सोपवली होती. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांचे विभाजन करणारी सीमारेषा रेखाटण्याचे काम त्यांना देण्यात आले होते. रॅडक्लिफ यांनी हे काम पटकन करून टाकले. देशाचे विभाजन करण्यासाठी रॅडक्लिफ यांनी नकाशावर फक्त एक रेषा काढली होती, असे काही ऐतिहासिक अहवाल सांगतात. याच आधारावर प्रत्यक्षातही विभाजन करण्यात आले. भूभागाचे विभाजन करता आले, मात्र संपत्ती, सैन्य, पैसे आणि इतर काही गोष्टींची वाटणी करणे तितकेही सोपे नव्हते; हे काम कसे फत्ते करण्यात आले ते पाहूयात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा