Tricolor Flag History भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास जितका गौरवशाली आहे, तितकाच गौरवशाली इतिहास राष्ट्रध्वजाचाही आहे. पारतंत्र्यापासून ते स्वातंत्र्यापर्यंत भारताच्या ध्वजाचे स्वरूप बदलत गेले. आताच्या तिरंग्यात केशरी, पांढरा व हिरवा रंग आहे. केशरी रंग शौर्य व त्यागाचे प्रतीक, पांढरा रंग शांती व सत्याचे प्रतीक, हिरवा रंग ऐश्वर्याचे प्रतीक आणि त्यावरील निळ्या रंगाचे अशोक चक्र गतीचे द्योतक आहे. परंतु, राष्ट्रध्वजाला हे स्वरूप वर्षानुवर्षे झालेल्या बदलानंतर मिळाले आहे. काय आहे भारताच्या राष्ट्रध्वजाचा इतिहास? याविषयी सविस्तर जाणून घेऊ.

ध्वजाचा इतिहास

१८५७ च्या बंडानंतर ब्रिटिश शासकांनीच भारतासाठी एका ध्वजाची कल्पना मांडली होती. त्यावर अनेकांचा विश्वास आहे आणि अनेक जण ही गोष्ट नाकारतातही. सर्वांत पहिल्या ध्वजाची रचना पाश्चात्त्य मानकांवर आधारित होती; ज्यावर एक तारा आणि शाही मुकुट होता. मुकुट हे भारतातील शाही राजवटीचे प्रतीक होते. परंतु, ही पाश्चात्त्य रचना नाकारून, त्यावेळी अनेकांनी स्वतः ध्वजाची रचना तयार करण्यास सुरुवात केली. स्वामी विवेकानंदांच्या आयरिश शिष्य सिस्टर निवेदिता यांनी १९०४ ते १९०६ दरम्यान ध्वजाची रचना केल्याची नोंद आहे. तो ध्वज लाल आणि पिवळ्या रंगाचा होता आणि त्यावर वज्राचे (इंद्रदेवाचे शस्त्र) चिन्ह होते. त्यावर बंगालीमध्ये ‘वंदे मातरम्’ लिहिले होते. लाल आणि पिवळा रंग स्वातंत्र्य आणि विजयाचे प्रतीक आहेत; तर वज्र हे शक्तीचे प्रतीक आहे.

Bhagwan Rampure on Statue Collapse
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : “चूक शिल्पकाराची नाही, मला दुःख आहे की…”, प्रख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांचा सरकारवर गंभीर आरोप
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Me Too malayalam dubbing artist
Me Too : “बलात्काराचं दृष्य १७ वेळा चित्रीत करायला लावलं, दिग्दर्शकाने त्यानंतर…”, मल्याळम अभिनेत्रीने सांगितली आपबिती
Salman Khan Dance Video
Video: सलमान खानचा ‘जलवा’ गाण्यावर जबरदस्त डान्स, मंचावर बसलेल्या अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया पाहिलीत का?
kangana ranaut chirag paswan chemistry
Kangana Ranaut-Chirag Paswan: चिराग पासवान यांच्यासोबतचे फोटो चर्चेत; कंगना रणौत म्हणाल्या, “तो माझा चांगला मित्र आहे”!
kandahar hijack controversy netflix
Netflix’s IC 814: द कंदहार हायजॅक, दहशतवाद्यांच्या नावांवरून पेटला वाद; नेमकं प्रकरण काय?
jam saheb digvijay singhji
गुजरातच्या या महाराजांची पोलंडच्या घरोघरी पूजा, रस्तेही त्यांच्याच नावावर; कारण काय? कोण होते महाराजा जाम साहेब?
Shilpa Shetty Post on Ladki Bahin Yojana
Shilpa Shetty : लाडकी बहीण योजनेवर शिल्पा शेट्टीची पोस्ट, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी..”
१८५७ च्या बंडानंतर ब्रिटिश शासकांनीच भारतासाठी एका ध्वजाची कल्पना मांडली होती. (छायाचित्र-पीटीआय)

हेही वाचा : बांगलादेशात १५ ऑगस्ट राष्ट्रीय शोक दिवस म्हणून का पाळतात? अंतरिम सरकारने या दिवसाविरुद्ध घेतलेल्या नव्या निर्णयाने वाद का पेटलाय?

परंतु, देशाचा पहिला राष्ट्रीय ध्वज ७ ऑगस्ट १९०६ रोजी कोलकातामधील पारसी बागान स्क्वेअर (ग्रीन पार्क) येथे फडकवण्यात आला. या ध्वजाची रचना सचिंद्र प्रसाद बोस आणि हेमचंद्र कानूनगो यांनी केली, असे मानले जाते. त्यात हिरवा, पिवळा व लाल अशा तीन रंगांचे आडवे पट्टे होते आणि मध्यभागी वंदे मातरम्, असे लिहिलेले होते. त्याव्यतिरिक्त ध्वजावरील लाल पट्टीवर सूर्य व अर्धचंद्र यांची चिन्हे होती आणि हिरव्या पट्टीमध्ये आठ अर्ध्या पाकळ्या फुललेल्या कमळाचे चिन्ह होते.

१९०७ मध्ये मादाम भिकाजी कामा यांनी स्टुटगार्ट येथील दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत भारताचा दुसरा ध्वज फडकवला होता. त्या भारताबाहेर राहून भारतातील ब्रिटिश राजवटीविरोधात काम करायच्या. परंतु, या ध्वजाकडे फारसे लक्ष वेधले गेले नाही. पहिल्या ध्वजाप्रमाणे यावरही ‘वंदे मातरम्’ लिहिलेले होते. १९१७ मध्ये डॉ. ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी होमरूल चळवळीचा एक भाग म्हणून नवीन ध्वजाचा स्वीकार केला. त्यात पाच लाल आणि चार हिरवे आडवे पट्टे एकाआड एक होते. त्यावर सात तारे होते. हे सात तारे आकाशात दिसणार्‍या सप्तर्षींच्या आकृतीप्रमाणे होते आणि दुसऱ्या बाजूला युनियन जॅक होता.

तिरंग्याच्या रचनेची सुरुवात

आज आपल्याला माहीत असलेला तिरंगा हा मुख्यत्वे स्वातंत्र्यसैनिक पिंगली व्यंकय्या यांच्या रचनेवर आधारित आहे; ज्यांना ‘जपान व्यंकय्या’ म्हणूनही ओळखले जाते. व्यंकय्या ब्रिटिश भारतीय सैन्यात सैनिक म्हणून काम करीत होते आणि दुसऱ्या बोअर युद्धासाठी (१८९९-१९०२) दक्षिण आफ्रिकेत तैनात होते. प्रथम राष्ट्रीय ध्वजाची रचना करण्याच्या कल्पनेने त्यांना धक्का बसला. युनियन जॅकने ब्रिटिश सैनिकांमध्ये राष्ट्रत्वाची भावना कशी निर्माण केली, हे त्यांनी पाहिले आणि हेच त्यांच्यासाठी प्रेरणादायी ठरले. याच कार्यकाळात ते दक्षिण आफ्रिकेत महात्मा गांधींनाही भेटले आणि ते एक कट्टर गांधीवादी झाले.

महात्मा गांधींच्या संग्रहित कार्यात प्रकाशित झालेल्या गांधीजींनी लिहिलेल्या एका पत्रात त्यांनी संविधान सभेने स्वीकारलेल्या ध्वजावर आपला आक्षेप व्यक्त केला. (संग्रहीत छायाचित्र-लोकसत्ता)

१९२१ मध्ये बेजवाडा येथील अखिल भारतीय काँग्रेस कमिटीमध्ये व्यंकय्या यांनी गांधींची भेट घेतली आणि त्यांनी तयार केलेली तिरंग्याची रचना दाखवली होती. त्याला स्वराज ध्वज, असे म्हणतात. त्यात लाल आणि हिरवा अशा दोन रंगांच्या पट्ट्यांचा समावेश होता. हे दोन रंग हिंदू आणि मुस्लीम या दोन प्रमुख धार्मिक समुदायांचे प्रतिनिधित्व करीत होते. ध्वजावर स्वराज्याचे प्रतिनिधित्व करणारा चरखाही होता. परंतु, महात्मा गांधींनी शांतता आणि भारतात राहणाऱ्या उर्वरित समुदायांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पांढरा पट्टा आणि देशाच्या प्रगतीचे प्रतीक म्हणून चरखा जोडण्याची सूचना केली.

१३ एप्रिल १९२३ रोजी जालियनवाला बाग हत्याकांडाच्या स्मरणार्थ नागपुरात काँग्रेसच्या स्थानिक स्वयंसेवकांनी काढलेल्या मिरवणुकीत व्यंकय्या यांनी तयार केलेला ‘स्वराज’ ध्वज फडकवण्यात आला. या ध्वजाचा वापर होत राहिला; परंतु त्याबाबत अनेक मतभेद होते. १९३१ च्या सुमारास ध्वजाच्या धार्मिक पैलूंबद्दल आणि ते धर्मनिरपेक्ष स्वरूपाचे आहेत की नाही याबद्दल चिंता व्यक्त केली गेली. तेव्हाच एक ध्वज समिती स्थापन करण्यात आली आणि त्यांनी ध्वजाची नवीन कल्पना सुचवली. त्यानंतर लाल रंगाच्या जागी केशरी रंग आला आणि रंगांचा क्रमही बदलला. या ध्वजाकडे आता जरी धर्माचे प्रतीक म्हणून पाहिले जात असले तरी समितीने या रंगांचा धर्मांशी असलेला अर्थ काढून टाकला होता.

आजचा तिरंगा

२३ जून १९४७ रोजी संविधान सभेने स्वतंत्र भारतासाठी ध्वज निवडण्याकरिता एक तदर्थ समिती स्थापन केली. या समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते आणि त्यात मौलाना अबुल कलाम आझाद, सरोजिनी नायडू, सी. राजगोपालाचारी, के. एम. मुन्शी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा समावेश होता. १४ जुलै १९४७ रोजी समितीने शिफारस केली की, स्वराज ध्वजाला योग्य बदलांसह भारताचा राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारले जावे. इतिहास सांगतो की, अखेर २२ जुलै रोजी भारताच्या संविधान सभेच्या सदस्यांची दिल्लीतील घटना सभागृहात बैठक झाली. त्यात राष्ट्रध्वजाचा मुद्दा प्राधान्य क्रमावर होता. १९३१ साली स्वीकृत झालेल्या ध्वजात समितीने यात चरख्याच्या जागी सारनाथच्या अशोकस्तंभावर असलेले धर्मचक्र घेतले.

१५ ऑगस्ट १९४७ ला दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भारताच्या स्वातंत्र्याची ग्वाही देताना तिरंगा अभिमानाने फडकवण्यात आला. (छायाचित्र-पीटीआय)

परंतु, संविधान सभेने प्रस्तावित केलेल्या ध्वजावर गांधीजी नाखुश होते. महात्मा गांधींच्या संग्रहित कार्यात प्रकाशित झालेल्या गांधीजींनी लिहिलेल्या एका पत्रात त्यांनी संविधान सभेने स्वीकारलेल्या ध्वजावर आपला आक्षेप व्यक्त केला. युनियन जॅक नसणे आणि चरखा (चरखा) बदलून अशोक चक्र, या दोन कारणांमुळे ते रचनेवर नाराज होते. आपल्या पत्रात गांधीजींनी भारताचे शेवटचे ब्रिटिश व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांनी प्रस्तावित केलेल्या ध्वजासाठी आपला पाठिंबा दर्शविला. परंतु, जवाहरलाल नेहरूंनी हा ध्वज नाकारला होता. गांधीजींनी भारताच्या राष्ट्रध्वजात युनियन जॅक कॅन्टनचा समावेश करण्याविषयी सांगितले. इंग्रजांनी भारतीयांचे नुकसान केले असले तरी ते त्यांच्या ध्वजामुळे झाले नाही, असे त्यांचे मत होते.

हेही वाचा : हिंडनबर्गच्या आरोपांनंतर संयुक्त संसदीय समितीमार्फत सखोल चौकशीची मागणी; ही समिती कसे काम करते? सरकारचा या समितीला विरोध का?

“पण, आपल्या ध्वजाच्या एका कोपऱ्यात युनियन जॅक असण्यात गैर काय आहे? इंग्रजांनी आपले नुकसान केले असेल, तर ते त्यांच्या ध्वजाने केलेले नाही आणि आपणही इंग्रजांचे गुण लक्षात घेतले पाहिजेत. आपल्या हातात सत्ता सोडून, ते स्वेच्छेने भारतातून माघार घेत आहेत”, असे गांधीजी यांनी नेहरूंना लिहिले. नेहरूंना लिहिलेल्या पत्रात त्यांनी लिहिले, “मी हे सांगायलाच हवे की, जर भारतीय संघराज्याच्या ध्वजावर चरख्याचे प्रतीक नसेल, तर मी त्या ध्वजाला वंदन करण्यास नकार देईन. तुम्हाला माहीत आहे की, भारताच्या राष्ट्रध्वजाचा विचार मी प्रथम केला होता आणि चरख्याच्या चिन्हाशिवाय मी भारताच्या राष्ट्रध्वजाची कल्पना करू शकत नाही.” अखेर १५ ऑगस्ट १९४७ ला दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भारताच्या स्वातंत्र्याची ग्वाही देताना ध्वज अभिमानाने फडकवण्यात आला. २६ जानेवारी २००२ ला भारताच्या ध्वजसंहितेत बदल करण्यात आला आणिसर्व नागरिकांना घरांवर, कार्यालयांवर ध्वज फडकवण्याची परवानगी देण्यात आली.