भारताची आर्थिक राजधानी मुंबई नवीन विमान वाहतुकीला चालना देण्यासाठी सज्ज आहे. एप्रिलमध्ये बहुप्रतिक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. हे मुंबईतील दुसरे विमानतळ असणार आहे. मात्र, मुंबईत तिसरे विमानतळ उभारण्याचीदेखील योजना आखली जात आहे. प्राप्त अहवालात असे म्हटले आहे की, ‘मॅक्सिमम सिटी’ हे भारतातील पहिले ऑफशोअर विमानतळ असेल. शहराच्या मध्यभागी असलेल्या विद्यमान विमानतळापासून अंदाजे १२० किलोमीटर अंतरावर वाढवण बंदराजवळील एका कृत्रिम बेटावर हे नवीन विमानतळ बांधण्यासाठी योजना आखण्यात आली आहे. ब्लूमबर्गच्या एका अहवालात सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार म्हटले आहे की, ही कल्पना चीनच्या डॅलियन जिंझोउ बे आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि जपानच्या कानसाई आंतरराष्ट्रीय विमानतळासारखी असेल, ही विमानतळे मानवनिर्मित बेटांवर बांधली गेली आहे. काय आहे हा प्रकल्प? त्याचे महत्त्व काय? त्याविषयी सविस्तर जाणून घेऊ.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा