बांगलादेशच्या चट्टोग्राम आणि मोंगला बंदरांमध्ये भारताला आता कायमस्वरूपी प्रवेश मिळाला आहे. ही दोन्ही बंदरे बांगलादेशमधील मुख्य बंदरे असून त्यांचा कायमस्वरूपी तत्त्वावर मिळणारा प्रवेश हा आंतराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचा मानला जात आहे. या ऐतिहासिक निर्णयात, बांगलादेशने भारताला चट्टोग्राम आणि मोंगला बंदरांमध्ये मालवाहू जहाजांची ये-जा आणि मालवाहतूकीसाठी प्रवेश दिला आहे. यामुळे भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये भारताकडून होणाऱ्या मालाची वाहतूक करण्यासाठी लागणारा वेळ आणि खर्च यांच्यात लक्षणीय घट अपेक्षित आहे. याशिवाय भारताचा बंगालच्या उपसागरात प्रादेशिक संपर्क (कनेक्टिव्हिटी) वाढण्यासही मदत होणार आहे. ही घटना सामान्य वाटत असली तरी जागतिक राजकारणात या घटनेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ही घटना म्हणजे चीनच्या कावेबाजपणाला भारतीय मुत्सद्देगिरीने दिलेले उत्तर आहे, असे मानले जाते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा