भारत आणि कॅनडा यांच्यात बिघडलेल्या संबंधांमुळे कॅनडामध्ये शिकणाऱ्या भारतीयांच्या कुटुंबांमध्ये त्यांच्या मुलांची सुरक्षितता आणि त्यांचे भविष्य यांबद्दल चिंता निर्माण झाली आहे. अलीकडेच दोन्ही देशांनी आपले उच्चायुक्त आणि अन्य राजनैतिक अधिकार्यांना परत बोलावण्याची घोषणा केल्यामुळे या दोन्ही देशांमधील संबंध आणखीनच चिघळले आहेत. गेल्या सप्टेंबरमध्ये कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी कॅनडाच्या भूमीवर खलिस्तानी फुटीरतावादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारतीय अधिकाऱ्यांचा संभाव्य सहभाग असल्याचा आरोप केल्यानंतर तणाव निर्माण झाला. आता भारताने परत बोलावलेले उच्चायुक्त संजय कुमार वर्मा यांनी कॅनडातील भारतीय विद्यार्थ्यांना उत्तर अमेरिकन देशातील खलिस्तानी दहशतवाद्यांकडून धोका असल्याने सावध राहण्याचा इशारा दिला आहे. कॅनडातील भारतीय विद्यार्थ्यांवर खलिस्तानसमर्थक प्रभाव टाकत आहेत का? त्यांना खरोखरच धमकावले जात आहे का? याविषयी जाणून घेऊ.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा