इस्रायल आणि हमास यांच्यादरम्यान युद्ध सुरू असल्यामुळे पॅलेस्टाइन आणि इस्रायल यांच्यादरम्यान असलेल्या जेरुसलेम शहराची पुन्हा एकदा चर्चा होत आहे. ख्रिश्चन, मुस्लीम व ज्यू या तीनही धर्मांसाठी हे शहर पवित्र मानले जाते. मात्र, जेरुसलेम हे जगातील सर्वांत वादग्रस्त शहर होण्याआधी १२ व्या शतकात भारताने या ठिकाणी स्वतःचे अस्तित्व निर्माण केले होते; जे आजही कायम आहे. या प्राचीन शहरात तपकिरी रंगाची एक दुमजली इमारत उभी आहे; ज्यावर “भारतीय धर्मशाळा, स्थापना- इसवी सन १२ वे शतक, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, नवी दिल्ली, भारत सरकार” असा फलक दिसून येतो. या धर्मशाळेकडे जाण्यासाठी असलेल्या रस्त्याला ‘झवियत-अल-हुनुद’, असे अरबी भाषेत नाव देण्यात आले आहे; ज्याचा अर्थ ‘इंडियन कॉर्नर’ असल्याचे सांगितले जाते. ऑक्टोबर २०२१ साली परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी भारत-जेरुसलेमच्या ८०० वर्षांच्या जुन्या संबंधावर प्रकाश टाकणाऱ्या या इमारतीच्या नव्या फलकाचे अनावरण केले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा