भारतात वाहतुकीच्या साधनांमध्येही अत्याधुनिक प्रगती होताना दिसत आहे. सध्या भारतात हायपरलूप ट्रॅकची चर्चा सुरू आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनीदेखील याविषयीचे एक ट्विट केले आहे. तमिळनाडूतील चेन्नईमध्ये ४१० मीटर लांबीचा हायपरलूप चाचणी ट्रॅक पूर्ण झाला आहे. त्यामुळे भारत आपल्या हायपरलूपच्या स्वप्नांच्या एक पाऊल जवळ पोहोचला आहे. थायूरमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मद्रासच्या डिस्कव्हरी कॅम्पसमध्ये स्थित हा ट्रॅक देशाच्या हाय-स्पीड वाहतूक उद्दिष्टांमध्ये प्रगती दर्शवतो. गुरुवारी (५ डिसेंबर) ‘एक्स’वर हायपरलूप चाचणी ट्रॅकचा व्हिडीओ शेअर करत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लिहिले, “भारताचा पहिला हायपरलूप चाचणी ट्रॅक (४१० मीटर) पूर्ण झाला.” या प्रकल्पासाठी त्यांनी भारतीय रेल्वे, आयआयटी-मद्रासची हायपरलूप टीम आणि TuTr Hyperloop या आयआयटी मद्रासच्या सखोल तंत्रज्ञान स्टार्टअपचे अभिनंदन केले. हायपरलूप तंत्रज्ञान म्हणजे काय? त्याचा भारताला कसा फायदा होणार? जाणून घेऊ.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा