चीन हा आपल्या विस्तारवादी भूमिकेसाठी ओळखला जातो. मग तो व्यापार असो वा राजकारण; प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अशा दोन्ही स्वरूपात आपला प्रभाव आणि देशाच्या सीमा वाढविण्याचा उद्देश चीनच्या प्रत्येक कृतीतून दिसतो. भारताचा शेजारी असलेला हा देश जागतिक महासत्ता होऊ पहात असताना, शेजारील देशाचा भू भाग कशाप्रकारे युद्ध न करता बळकावता येईल अशीही मनीषा बाळगून आहे. त्याचीच प्रचिती चीनच्या ‘शाओकांग’ या प्रकल्पातून येते. गेल्या पाच वर्षांहूनही अधिक कालखंडापासून तिबेटच्या स्वायत्त प्रदेशासह भारताच्या सीमेवर चीनकडून ६०० हून अधिक गावं विकसित करण्यात आली आहेत. चिनी भाषेतील शाओकांग म्हणजे सुसंपन्न गावे. या प्रकल्पाची सुरुवात होऊन पाच वर्षांचा कालखंड लोटलेला असला तरी अद्याप या गावांमध्ये वस्ती करण्यात आलेली नव्हती. परंतु गेल्या काही महिन्यांपासून चिनी लोकांकडून गावांमध्ये स्थलांतराला सुरुवात झाली आहे. चिनी लोकांनी भारताच्या ईशान्य संरक्षण सीमेवर असलेल्या गावांमध्ये स्थलांतराला सुरुवात केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा