Indus valley civilization सिंधू संस्कृती हे भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे पर्व आहे. सिंधू संस्कृती अनेकविध गोष्टींसाठी ओळखली जाते. त्यातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लिपी. एखाद्या जागेचा इतिहास नेमका काय आहे, हे जाणून घेण्यासाठी लिखित स्वरूपातील कोणतेही साहित्य महत्त्वाचे ठरते. सिंधू संस्कृतीने भारतीय इतिहासातील नागरीकरणाचा पहिला टप्पा जगासमोर आणला. त्यामुळे भारतीय इतिहासात किमान ५००० वर्षांपासून लेखन कला अवगत होती हे उघड झाले. सिंधू संस्कृतीच्या कालखंडातील लिपी सिंधू किंवा हडप्पा लिपी म्हणून ओळखली जाते. सिंधू लिपी इसवी सनपूर्व ३५०० ते २७०० या कालखंडात विकसित झाल्याचे बहुतांश अभ्यासक मानतात. उत्खननात सापडलेल्या हडप्पाकालीन मृण्मय मुद्रा, मातीची भांडी यांसारख्या अनेक वस्तूंवर ही लिपी कोरलेली सापडली असली, तरी या लिपीचा उगम कोणता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आजही ही लिपी गूढ आहे. वेगवेगळ्या अभ्यासकांनी या लिपीच्या उत्पत्तीविषयी काही महत्त्वाचे तर्क मांडले आहे. काही अभ्यासकांच्या मते या लिपीचे मूळ संस्कृतमध्ये आहे, तर काही अभ्यासक ते द्रविडीयन असल्याचे मानतात. त्याच पार्श्वभूमीवर या लिपीच्या उत्पत्तीसंदर्भात वेगवेगळ्या अभ्यासकांनी नेमकी कोणती भूमिका मांडली आहे, हे समजून घेणे महत्त्वाचे ठरावे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा