Indus valley civilization इंग्रज भारतात आले तोपर्यंत भारतीय उपखंडाने आपली बरीचशी समृद्धी गमावली होती. त्यामुळे भारत हा इतिहासात कितीही संपन्न देश असला तरी या कालखंडात मात्र गरीब, अशिक्षित अशीच भारताची प्रतिमा इंग्रजांसमोर होती. याच कारणामुळे भारताला काही संस्कृती असू शकते यावर या पश्चिमात्य लोकांचा विश्वासच नव्हता, त्यामुळेच त्यांच्याकडून त्याच दृष्टिकोनातून भारताचा इतिहास लिहिला गेला. परंतु त्यांच्या या विश्वासाला तडा जाणारी एक गोष्ट १९२० च्या दशकात घडली; ती म्हणजे एका रेल्वेमार्गाचं काम सुरु असताना काही प्राचीन अवशेष आपले अस्तित्त्व दाखवत अवतीर्ण झाले… आणि जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. प्राचीन अवशेषांची ही संस्कृती सिंधू, हडप्पा, सरस्वती अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखली गेली. या संस्कृतीने भारतीय इतिहासातील नागरीकरणाचा पहिला टप्पा जगासमोर आणला. इतकेच नाही तर भारतीय इतिहासात किमान ५००० वर्षांपासून लेखनकला अवगत होती हेही उघड झाले. तत्कालीन लिपी सिंधू किंवा हडप्पा लिपी म्हणून ओळखली जाते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा