दिल्लीमध्ये नुकत्याच पार पडलेल्या जी-२० सदस्य राष्ट्रांच्या शिखर परिषदेत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयांतर्गत भारत, पश्चिम आशिया व युरोप यांना जोडणारी एक दळणवळण मार्गिका (कनेक्टिव्हिटी कॉरिडॉर) लवकरच सुरू करण्यात येणार आहे. तसा करार या बैठकीत करण्यात आला. हा करार म्हणजे भारताला मिळालेले सर्वांत मोठे राजनैतिक यश आहे, असा दावा भारताकडून केला जात आहे. विशेष म्हणजे हा प्रकल्प म्हणजे चीनच्या ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’ या प्रकल्पाला पर्याय असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, एकीकडे जी-२० परिषदेत कनेक्टिव्हिटी कॉरिडॉरची निर्मिती करण्यावर एकमत झालेले असताना इटली हा देश मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. इटली लवकरच चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (BRI) या प्रकल्पातून बाहेर पडू शकतो. याच पार्श्वभूमीवर इटली हा निर्णय का घेणार आहे? भारताची या प्रकल्पाबाबत काय भूमिका आहे? हे जाणून घेऊ या…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा