भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा सध्या पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. याच कारणामुळे त्याला आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकाला मुकावे लागणार आहे. पाठीच्या दुखण्यातून पूर्णपणे बरा न झाल्यामुळे तो या स्पर्धेच्या बाहेर असणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शहा यांनी तशी माहिती दिलेली आहे. दरम्यान, बुमरा हा जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजांपैकी एक आहे. त्याच्या अनुपस्थितीमुळे भारतीय क्रिकेट संघाला अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. बुमरा संघात नसल्यामुळे भारतीय संघ यावेळी टी-२० विश्वचषक जिंकणार का? असा प्रश्न विचारला जातोय. याच पार्श्वभूमीवर बुमरा संघात असल्यानंतर टीम इंडियाने कशी कामगिरी केलेली आहे आणि तो संघात नसल्यावर भारतीय संघ तसेच इतर गोलंदाजांनी कसा खेळ केलेला आहे, यावर एक नजर टाकुया.

हेही वाचा >>> विश्लेषण : मेसी, रोनाल्डोचे विक्रम मोडणारा, फुटबॉल विश्वात सर्वाधिक चर्चेत असलेला हालँड कोण आहे?

Harshit Rana concussion substitue replaces shivam dube
Harshit Rana Concussion : फलंदाजाच्या जागी गोलंदाज कसा येऊ शकतो? भारताच्या विजयानंतर कनक्शन सबस्टिट्यूटवरुन पेटला वाद
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Ranji Trophy Cricket Tournament Mumbai vs Meghalaya match sports news
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा: मुंबईला विजय अनिवार्य,आजपासून मेघालयाशी गाठ; बडोदा विरुद्ध जम्मूकाश्मीर लढतीवरही लक्ष
Hardik Pandya knock put pressure on other India batters say Parthiv Patel after Team India defeat against England
IND vs ENG : ‘त्याच्या संथ खेळीमुळे इतर फलंदाजांवर दबाव वाढला,’ माजी खेळाडूने भारताच्या पराभवाचे खापर हार्दिकवर फोडले
We always learn from a T20I Game Says Suryakumar Yadav after defeat against England in 3rd T20I
IND vs ENG : ‘…म्हणून पराभव पदरी पडला’, सूर्यकुमार यादवने सांगितला राजकोट सामन्यातील टर्निंग पॉइंट
Jasprit Bumrah Wins ICC Mens Test Cricketer of The Year 2024 With Historic Performance
Jasprit Bumrah: ‘गेमचेंजर’ जसप्रीत बुमराहची ऐतिहासिक कामगिरी, ICC चा ‘हा’ पुरस्कार जिंकणारा भारताचा पहिला वेगवान गोलंदाज
IND vs ENG Tilak Varma reveals Head Coach Gautam Gambhir advice after Chennai T20I win
IND vs ENG : ‘काहीही झालं तरी…’, तिलक वर्माने विजयानंतर गौतम गंभीरने दिलेल्या गुरुमंत्राचा केला खुलासा
Tilak Varma Scores Most T20I Runs in Between Two Dismissals Broke Mark Chapman Record
IND vs ENG: तिलक वर्माने घडवला इतिहास, टी-२० मध्ये नाबाद राहत केल्या इतक्या धावा; ‘ही’ कामगिरी करणारा पहिला फलंदाज

जसप्रित बुमरा हा सामन्याच्या कोणत्याही टप्प्यात चांगली गोलंदाजी करणारा गोलंदाज आहे. पॉवरप्ले, मिडल ओव्हर, तसेच डेथ ओव्हरमध्ये त्याने उत्तम गोलंदाजी करत विरोधी संघातील फलंदाजांना जेरीस आणलेले आहे. तसे आकडेही समोर आहेत. इतर गोलंदाजांच्या तुलनेत बुमराचा इकोनॉमी रेट चांगला आहे.

भारतीय गोलंदाजांचा इकोनॉमी रेट

गोलंदाजपॉवरप्ले इकोनॉमी रेटमिडल ओव्हर इकोनॉमी रेटडेथ ओव्हर इकोनॉमी रेट
जसप्रित बुमरा५.५७५.८८.१५
भुवनेश्वर कुमार५.८१७.२११०.०३
अर्शदीप सिंग६.६५८.७५१८
आवेश खान७.७५८.६६८.५३
मोहोम्मद शामी११.४२९.६२
दीपक चहर८.३८९.०७११.०४
हर्षल पटेल८.०२८.०२११.०७

हेही वाचा >>> विश्लेषण : प्रभासच्या बिगबजेट ‘आदिपुरुष’ चित्रपटावर बंदीची मागणी, राजकीय वर्तुळातून गंभीर आक्षेप; नेमकं वादाचं कारण काय?

बुमरा संघात असणे ही भारतासाठी जमेची बाजू असते. मात्र बुमरा संघात असतो तेव्हा भारताचे इतर गोलंदाजही चांगली कामगिरी करताना दिसतात. सध्या उपलब्ध असलेल्या आकडेवारीतून ते स्पष्ट होते. बुमरा संघात असताना तसेच तो संघात नसताना इतर गोलंदाजांच्या इकोनॉमी रेटमध्ये बराच फरक दिसून येतो.

बुमराह संघात असताना आणि नसताना इतर गोलंदाजांची कामगिरी

गोलंदाज(इकोनॉमी रेट) बुमरा संघात असताना(इकोनॉमी रेट) बुमरा संघात नसताना
आर. अश्विन६.१२६.८१
कुलदीप यादव६.७७७.०३
भुवनेश्वर कुमार६.८५७.२५
रविंद्र जडेजा६.८७७.०४
युझवेंद्र चहल७.९६८.२३
हार्दिक पांड्या८.२८८.३७
शार्दुल ठाकूर८.९५९.२७

हेही वाचा >>> विश्लेषण: ट्विटर खरेदी करण्याची मस्क यांची पुन्हा ऑफर, ट्विटरची भूमिका काय? व्यवहारात न्यायालयीन अडचण काय?

भारतीय संघाला जसप्रित बुमराचा फायदाच झालेला आहे. तो संघात असताना भारताला अनेक सामन्यात विजय प्राप्त करता आलेला आहे. बुमरा जेव्हा प्लेइंग इलेव्हनमध्ये असतो तेव्हा भारताने ७६ टक्के सामने जिंकलेले आहे. तर तो जेव्हा प्लेइंग ११ मध्ये नसतो तेव्हा भारताने ६८ टक्के सामने जिंकलेले आहेत. तो संघात असताना भारताने १२ टक्के सामने गमावलेले आहेत. तर तो संघात नसताना भारताने ३३ टक्के सामने गमावलेले आहेत.

बुमराह संघात असताना भारतीय संघाची कामगिरी

लढतीतील परिणामबुमरा संंघात असतानाबुमरा संघात नसताना
विजय७६ टक्के६८ टक्के
पराभव१२ टक्के३३ टक्के
अनिर्णित१२ चक्केआकडेवारी उपलब्ध नाही.

हेही वाचा >>> विश्लेषण: रशिया, चीनपेक्षा उत्तर कोरियापासून अणुयुद्धाचा जास्त धोका आहे? किम जोंग उन यांच्या क्षेपणास्त्र चाचण्यांचा परिणाम किती?

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी बुमरा भारतीय संघात नसल्यामुळे भारतीय क्रिकेटप्रेमी निराश झाले आहेत. बुमराची जागा भरून काढणाऱ्या खेळाडूचा बीसीसीआयकडून शोध घेतला जातोय. मात्र बुमरा संघात नसल्यामुळे दुसऱ्या नव्या दमाच्या गोलंदाजांना स्वत:ला सिद्ध करण्याची ही नामी संधी असेल. अर्शदीप सिंग, हर्षल पटेल या गोलंदाजांनी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. त्यामुळे या टी-२० विश्वचषकातही हे गोलंदाज चांगली कामगिरी करतील अशी अपेक्षा आहे.

Story img Loader