दिल्लीत ५ ऑक्टोबरला ‘मिशन जय भीम’ आणि ‘द बुद्धिस्त सोसायटी ऑफ इंडिया’ या संस्थांनी धर्मांतरणाच्या निमित्ताने एका कार्यक्रमाचं आयोजन केलं. यावेळी जवळपास १० हजार लोकांनी बौद्ध धम्म स्वीकारला. या कार्यक्रमाला दिल्लीतील आम आदमी सरकारमध्ये मंत्री असलेले राजेंद्र पाल गौतम हेही हजर होते. मात्र, यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नवबौद्ध धम्मासाठी लिहिलेल्या २२ प्रतिज्ञा म्हटल्याने वाद निर्माण झाला. भाजपाने या प्रतिज्ञांवरून थेट मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याची मागणी केली. अखेर मंत्री राजेंद्र पाल गौतम यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. या पार्श्वभूमीवर धम्म चक्र प्रवर्तन दिनाचा इतिहास काय, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नवबौद्ध धम्मासाठी लिहिलेल्या २२ प्रतिज्ञा कोणत्या, या प्रतिज्ञांचं महत्त्व काय? याचा आढावा घेणारं हे विश्लेषण…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा